<rss version="2.0" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"><channel><title>pudharinews</title><link>https://pudhari.news</link><description>pudharinews</description><atom:link href="https://pudhari.news/stories.rss" rel="self" type="application/rss+xml"></atom:link><language>mr</language><lastBuildDate>Thu, 18 Jun 2026 17:28:03 +0000</lastBuildDate><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><item><title>FIFA World Cup 2026 | इंग्‍लंडचा क्रोएशियावर रोमांचक विजय! कर्णधार हॅरी केनचे दोन गोल </title><link>https://pudhari.news/sports/kane-double-fires-england-past-croatia-in-world-cup-thriller-ap84</link><comments>https://pudhari.news/sports/kane-double-fires-england-past-croatia-in-world-cup-thriller-ap84#comments</comments><guid isPermaLink="false">ec30623e-f22f-4a98-ac7f-d10c41e40775</guid><pubDate>Thu, 18 Jun 2026 17:21:30 +0000</pubDate><atom:updated>2026-06-18T17:21:30.885Z</atom:updated><atom:author><atom:name>पुढारी वृत्तसेवा</atom:name><atom:uri>/api/author/1960322</atom:uri></atom:author><description></description><media:keywords>sports,FIFA World Cup,Harry Kane</media:keywords><media:content height="797" url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/mx82sx4b/1.jpg" width="1417"><media:title type="html"><![CDATA[ FIFA World Cup 2026 | इंग्‍लंडचा क्रोएशियावर रोमांचक विजय! कर्णधार हॅरी केनचे दोन गोल इंग्‍लंडचा क्रोएशियावर रोमांचक विजय! कर्णधार हॅरी केनचे दोन गोल ]]></media:title><media:description type="html"><![CDATA[ FIFA World Cup 2026 |]]></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/mx82sx4b/1.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>स्पोर्ट्स</category><content:encoded><![CDATA[ <p><strong>डॅलस; वृत्तसंस्‍था : </strong>कर्णधार हॅरी केनचे दोन गोल आणि उत्तरार्धातील ज्युड बेलिंगहॅम व मार्कस रॅशफोर्डच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर इंग्लंडने फिफा विश्वचषक मोहिमेची धडाकेबाज सुरुवात केली आहे. डॅलस येथे झालेल्या अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडने क्रोएशियाचा ४-२ असा पराभव केला. क्रोएशियाने दोनदा बरोबरी साधून दिलेल्या धक्क्यांमधून सावरत इंग्लंडने दुसऱ्या सत्रात सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. या शानदार विजयासह ‘थ्री लायन्स'ने (इंग्लंड संघ) ग्रुप ‘एल’मध्ये अव्वल स्थान पटकावले असून, बुधवारी त्यांचा सामना घानाविरुद्ध होईल.	</p><p><strong>उत्तरार्धात ‘थ्री लायन्स’चे निर्भेळ वर्चस्व</strong></p><p>मध्यंतरानंतर मैदानावर उतरलेला इंग्लंडचा संघ पूर्णपणे बदललेला दिसला. उत्तरार्ध सुरू होताच अवघ्या दुसऱ्या मिनिटाला ज्युड बेलिंगहॅमने उजव्या बाजूने आगेकूच करत चेंडू गोलपोस्टच्या कोपऱ्यात धाडला आणि इंग्लंडला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. इंग्लंडने संपूर्ण सामन्यात तब्बल २२ शॉटस्‌ मारत क्रोएशियावर प्रचंड दबाव आणला. क्रोएशियाचा गोलरक्षक डॉमिनिक लिवाकोविचने काही उत्कृष्ट बचाव केले; परंतु अखेरच्या सत्रात रॅशफोर्डने चौथा गोल करून इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.</p><p><strong>कमकुवत बचाव, आक्रमक पवित्रा</strong></p><p>युरो २०२४ मधील गॅरेथ साऊथगेट यांच्या बचावात्मक रणनीतीच्या अगदी उलट चित्र यावेळी पाहायला मिळाले. मुख्य प्रशिक्षक थॉमस ट्युचेल यांच्या मार्गदर्शनाखालील इंग्लंडचा बचाव पूर्वार्धात कमालीचा डळमळीत आणि चिंताजनक वाटला. त्यांच्या आक्रमक फळीने मात्र क्रोएशियाच्या संरक्षणाची दाणादाण उडवली. हा सामना इंग्लंडच्या चाहत्यांना आनंद देणारा असला, तरी बचावातील चुका ट्युचेल यांच्यासाठी नक्कीच चिंतेचा विषय ठरतील.</p><p><strong>केनची दुहेरी चमक आणि क्रोएशियाचा पलटवार</strong></p><p>सामन्याच्या सुरुवातीलाच कर्णधार हॅरी केनने पुन्हा घेतलेली पेनल्टी आणि डेक्लिन राईसच्या उत्कृष्ट कॉर्नरवर मारलेला हेडर अशा दोन गोलसह इंग्लंडला मजबूत स्थितीत आणले. मात्र, क्रोएशियाने इंग्लंडच्या बचावातील त्रुटींचा फायदा उठवत पहिल्या दोन शॉटस्‌वरच गोल डागले. जॉन स्टोन्सच्या चुकीचा फायदा घेत मार्टिन बटुरिनाने पहिला गोल केला. त्यानंतर एझरी कोन्सा आणि जॉन स्टोन्सची जोडी पेटार मुसाला रोखण्यात अपयशी ठरली. यामुळे क्रोएशियाने सामन्यात २-२ अशी बरोबरी साधली होती.</p>]]></content:encoded></item><item><title>Beed News | केज तालुक्यातील शिंदी येथे कुत्र्याच्या हल्ल्यात हरीण जखमी! </title><link>https://pudhari.news/maharashtra/marathwada/beed/beed-news-deer-injured-in-stray-dog-attack-at-shindi-village-in-kej-taluka-ng81</link><comments>https://pudhari.news/maharashtra/marathwada/beed/beed-news-deer-injured-in-stray-dog-attack-at-shindi-village-in-kej-taluka-ng81#comments</comments><guid isPermaLink="false">17f4c63f-e507-4b9a-88ab-b8acdf7cabfa</guid><pubDate>Thu, 18 Jun 2026 17:13:13 +0000</pubDate><atom:updated>2026-06-18T17:13:13.299Z</atom:updated><atom:author><atom:name>पुढारी वृत्तसेवा</atom:name><atom:uri>/api/author/1960322</atom:uri></atom:author><description></description><media:keywords>beed news,Deer</media:keywords><media:content height="675" url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/3fp631s8/pudhari-photo-64.jpg" width="1200"><media:title type="html"><![CDATA[ Beed News | केज तालुक्यातील शिंदी येथे कुत्र्याच्या हल्ल्यात हरीण जखमी! ]]></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/3fp631s8/pudhari-photo-64.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>बीड</category><content:encoded><![CDATA[ <p><strong>केज :-</strong> केज तालुक्यातील शिंदी येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात शेतात जखमी अवस्थेत असलेल्या एका गाभण हरिणीला कुत्र्याच्या तावडीतून सुटका करीत जखमी हरणावर उपचार करून वनविभाग आणि पोलिसांशी संपर्क साधून प्राण वाचविले आहेत. </p><p>दि. १७ जून रोजी केज तालुक्यातील शिंदी येथील शिवारात कुत्र्यांनी पाठलाग करून एका गाभण हरिणीच्या पायाला चावा घेऊन गंभीर जखमी केले होते. हे पहिल्या नंतर शेतात काम करीत असलेले मैनुद्दीन सय्यद यांनी जखमी हरिणीची कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली आणि रात्री तिला घरी घेऊन येत गोविंद पाटील आणि त्यांनी हरिणीच्या जखमेवर खाजगी उपचार करून सुश्रुषा केली. त्या नंतर त्यांनी केज पोलिस ठाण्याच्या डीएसबी विभागाचे शिवाजी कागदे आणि वनविभाग धारूरचे वन सेवक संभाजी पारवे व शाम गायसमुद्रे यांच्याशी संपर्क साधला. </p><p>वनविभागाचे शाम गायसमुद्रे, गोके यांनी गोविंद पाटील यांच्या ताब्यातील जखमी हरिणावर उपचार करण्यासाठी त्याला ताब्यात घेऊन उपचार करण्यासाठी पशु वैद्यकीय अधिकाऱ्याकडे घेऊन गेले. जखमी हरिणाची मैनुद्दीन सय्यद व गोविंद पाटील यांनी सुश्रुषा केल्या बद्दल आणि त्याला सुखरूप वनविभागाच्या ताब्यात देण्याच्या त्यांच्या कामगिरी बद्दल त्यांचे कौतुक होत आहे.</p>]]></content:encoded></item><item><title>Kalyan Dombivali |  खंबाळपाड्यातील वादग्रस्त बंगल्यावर केडीएमसीचा हातोडा </title><link>https://pudhari.news/maharashtra/thane/kdmc-demolishes-illegal-controversial-bungalow-at-khambalpada-in-kalyan-dombivali-ng81</link><comments>https://pudhari.news/maharashtra/thane/kdmc-demolishes-illegal-controversial-bungalow-at-khambalpada-in-kalyan-dombivali-ng81#comments</comments><guid isPermaLink="false">7feafc03-b2fe-4a6d-ade6-b8c913e5db37</guid><pubDate>Thu, 18 Jun 2026 17:02:43 +0000</pubDate><atom:updated>2026-06-18T17:02:43.866Z</atom:updated><atom:author><atom:name>पुढारी वृत्तसेवा</atom:name><atom:uri>/api/author/1960322</atom:uri></atom:author><description></description><media:keywords>KDMC,demolish</media:keywords><media:content height="675" url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/r7zvpmgp/pudhari-photo-63.jpg" width="1200"><media:title type="html"><![CDATA[ Kalyan Dombivali |  खंबाळपाड्यातील वादग्रस्त बंगल्यावर केडीएमसीचा हातोडा ]]></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/r7zvpmgp/pudhari-photo-63.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>ठाणे</category><content:encoded><![CDATA[ <p>डोंबिवली : अखेर खंबाळपाड्यातील वादग्रस्त बंगल्यावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून गुरूवारी कारवाई करण्यात आली. बंगल्याच्या अनधिकृत बांधकामाबत तक्रार करणाऱ्या प्रताप चौधरी या तरूणाची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. या घटनेनंतर परिसरात मोठा संताप व्यक्त झाला होता. परिसरातील रहिवाशांनी या बंगल्याच्या बांधकामाची चौकशी करून कारवाईची मागणी केली होती. </p><p>&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; प्रताप चौधरी याने सदर बंगल्याच्या अनधिकृत बांधकामाविरोधात सातत्याने आवाज उठवला होता. त्याच्या तक्रारीनंतरही कारवाई न झाल्याने वाद वाढला होता. त्याच्या मृत्यूनंतर प्रशासनावर दबाव वाढला आणि केडीएमसीने तातडीने पाहणी करून कारवाई सुरू केली. गुरूवारी अनधिकृत भागावर हातोडा चालवत बंगल्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले. या कारवाईमुळे खंबाळपाडा परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. एकीकडे अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर भूमिका घेणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून उमटत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणातील इतर पैलूंची चौकशी पोलिसांकडून अद्याप सुरू आहे.</p><p><br><strong>याच बांधकामावरून घडले हत्याकांड<br></strong><br>मंगळवारी २६ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास&nbsp;खंबाळपाड्यात भयंकर घटना घडली होती.&nbsp;प्रताप चौधरी (३२) याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही हत्या शेजारी राहणाऱ्या&nbsp;रोहित शेलार (२६) याने केली होती. शेलार कुटुंबियांकडून सुरू असलेल्या बंगल्याच्या बांधकामाबद्दल प्रताप चौधरी याने केडीएमसीकडे तक्रारींद्वारे तगादा लावला होता. आपल्या घराबद्दल तक्रार करतो म्हणून&nbsp;रोहित शेलार खवळला होता.&nbsp;घर बांधकामाच्या वादातून प्रतापचा   खून करुन रोहित पसार झाला होता. टिळकनगर पोलिसांनी ३ दिवसांच्या शोध मोहिमेनंतर&nbsp;मोठ्या महत्प्रयासाने&nbsp;त्याला अटक केली.</p>]]></content:encoded></item><item><title>Chandrapur Crime | बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेत डॉक्टर महिलेची पर्स लंपास</title><link>https://pudhari.news/maharashtra/vidarbha/chandrapur/chandrapur-crime-woman-doctor-purse-stolen-by-pickpockets-at-crowded-bus-stand-ng81</link><comments>https://pudhari.news/maharashtra/vidarbha/chandrapur/chandrapur-crime-woman-doctor-purse-stolen-by-pickpockets-at-crowded-bus-stand-ng81#comments</comments><guid isPermaLink="false">00c2e749-418e-4dd3-ae75-bf0ffddbe0e6</guid><pubDate>Thu, 18 Jun 2026 16:54:17 +0000</pubDate><atom:updated>2026-06-18T16:54:17.462Z</atom:updated><atom:author><atom:name>पुढारी वृत्तसेवा</atom:name><atom:uri>/api/author/1960322</atom:uri></atom:author><description></description><media:keywords>crime,chandrapur,theft</media:keywords><media:content height="675" url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-10/9oxrlp8j/crime-news" width="1200"><media:title type="html"><![CDATA[ Chandrapur Crime | बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेत डॉक्टर महिलेची पर्स लंपास]]></media:title><media:description type="html"><![CDATA[ Chandrapur Crime | बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेत डॉक्टर महिलेची पर्स लंपास]]></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-10/9oxrlp8j/crime-news?w=280" width="280"></media:thumbnail><category>चंद्रपूर</category><content:encoded><![CDATA[ <p><strong>चंद्रपूर  :</strong> भद्रावती बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिला डॉक्टरच्या पर्सवर हात साफ केल्याची घटना घडली. नागपूरला जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करत असताना होमिओपॅथिक डॉक्टर डॉ. ममता सारडा यांच्या खांद्यावरील बॅगेची चेन उघडून पर्स चोरून नेण्यात आली. या घटनेमुळे बसस्थानक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. </p><p>येथील रहिवासी होमिओपॅथिक डॉक्टर डॉ. ममता सारडा या नागपूरला जाण्यासाठी बसस्थानकावर उभ्या होत्या. यावेळी बसस्थानकावर मोठी गर्दी होती. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खांद्यावरील बॅगेची चेन उघडून आत ठेवलेली पर्स लंपास केली. </p><p>चोरीस गेलेल्या पर्समध्ये सुमारे २२ हजार रुपये रोख रक्कम, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. पर्स चोरी झाल्याचे लक्षात येताच डॉ. सारडा यांनी भद्रावती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे.&nbsp;</p>]]></content:encoded></item><item><title>Washim News : २६ वर्षीय ऑटोचालकाने घरात गळफास घेवून जीवन संपविले; रिसोडमधील घटना</title><link>https://pudhari.news/maharashtra/vidarbha/vashim/washim-news-26-year-old-auto-driver-ends-life-by-hanging-in-risod-rg84</link><comments>https://pudhari.news/maharashtra/vidarbha/vashim/washim-news-26-year-old-auto-driver-ends-life-by-hanging-in-risod-rg84#comments</comments><guid isPermaLink="false">4dd1ade8-1aad-4a11-9ec8-bfd4a7e4fe35</guid><pubDate>Thu, 18 Jun 2026 16:42:53 +0000</pubDate><atom:updated>2026-06-18T16:42:53.253Z</atom:updated><atom:author><atom:name>पुढारी वृत्तसेवा</atom:name><atom:uri>/api/author/1960322</atom:uri></atom:author><description></description><media:keywords>Washim News</media:keywords><media:content height="675" url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/10fchpwi/Washim-News-8.jpg" width="1200"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/10fchpwi/Washim-News-8.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>वाशिम</category><content:encoded><![CDATA[ <p><strong>वाशीम :</strong> रिसोड येथील निजामपूर मार्गावरील कदम मळा भागात एका २६ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १८ जून) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. अमर श्रीराम गायकवाड असे मृत युवकाचे नाव असून, तो रिसोड शहरात ऑटो चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.</p><p>मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अमरने राहत्या घरी गळफास घेतल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. घटनेच्या वेळी घरात कुटुंबातील अन्य कोणताही सदस्य उपस्थित नव्हता आणि घराचा दरवाजा आतून बंद होता.</p><p>घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दरवाजा उघडून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अमरने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी रिसोड पोलीस अधिक तपास करत आहेत.</p>]]></content:encoded></item><item><title>Parbhani Police |अवैध व्यवसायांना कथित संरक्षण : परभणी एलसीबीच्या निरीक्षकांसह नऊ जणांची उचलबांगडी! </title><link>https://pudhari.news/maharashtra/marathwada/parbhani/parbhani-police-lcb-inspector-and-nine-cops-transferred-over-alleged-protection-to-illegal-businesses-ng81</link><comments>https://pudhari.news/maharashtra/marathwada/parbhani/parbhani-police-lcb-inspector-and-nine-cops-transferred-over-alleged-protection-to-illegal-businesses-ng81#comments</comments><guid isPermaLink="false">6a9e1d99-3799-4e2c-ba46-512c0e6526e8</guid><pubDate>Thu, 18 Jun 2026 16:36:42 +0000</pubDate><atom:updated>2026-06-18T16:36:42.147Z</atom:updated><atom:author><atom:name>पुढारी वृत्तसेवा</atom:name><atom:uri>/api/author/1960322</atom:uri></atom:author><description></description><media:keywords>parbhani police</media:keywords><media:content height="720" url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-02/wv31vayc/Copy-of-pudhari-photo-2026-06-02T092815.611.jpg" width="1280"><media:title type="html"><![CDATA[ Parbani Police ]]></media:title><media:description type="html"><![CDATA[ Parbani Police ]]></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-02/wv31vayc/Copy-of-pudhari-photo-2026-06-02T092815.611.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>परभणी</category><content:encoded><![CDATA[ <p><strong>परभणी :</strong> जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना कथित संरक्षण दिल्याच्या गंभीर आरोपांमुळे स्थानिक गुन्हे शाखेवर (एलसीबी) मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांना तातडीने नांदेड येथील नियंत्रण कक्षात संलग्न केले असून शाखेत कार्यरत इतर आठ अंमलदारांनाही परभणी पोलीस मुख्यालयात संलग्न केले. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली असून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. </p><p>नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे दि.१६ जून रोजी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांबाबत गंभीर स्वरूपाची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीत जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतूक, उत्खनन तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांना स्थानिक गुन्हे शाखेतील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. विशेषतः जिल्ह्यात अवैध धंदे बिनधास्तपणे सुरू राहण्यामागे संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका असल्याचा मुद्दा तक्रारीत उपस्थित करण्यात आला होता. </p><p>या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस उपमहानिरीक्षकांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. सदर प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची जबाबदारी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. चौकशी दरम्यान संबंधित अधिकारी आणि अंमलदारांच्या कामकाजाची तपासणी करण्यात येणार असून आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास पुढील कठोर कारवाईची शक्यता व्यक्त होत आहे. चौकशी प्रक्रियेवर कोणताही परिणाम होऊ नये तसेच तपास निष्पक्षपणे पार पडावा यासाठी पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांना परभणीतून दूर करून नांदेड नियंत्रण कक्षात संलग्न करण्यात आले. याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेतील अन्य आठ अंमलदारांनाही पोलीस मुख्यालयात वर्ग करण्यात आले आहे. एका तक्रारीच्या पार्श्वभूमीवर एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली ही कारवाई पोलीस विभागात चर्चेचा विषय ठरली आहे.</p><p>दरम्यान, परभणी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायां विरोधात कठोर मोहीम राबविण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत. अवैध वाळू उत्खनन, वाहतूक, जुगार, मटका, अवैध दारू विक्री आणि इतर बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई करून त्यांचे संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे नांदेड परिक्षेत्र कार्यालयाने स्पष्ट केले आहे.</p><p>परभणी जिल्ह्यात काही महिन्यांपासून अवैध व्यवसायांच्या वाढत्या प्रमाणाबाबत विविध स्तरांतून नाराजी व्यक्त होत होती. अशा परिस्थितीत स्थानिक गुन्हे शाखेवरच संशयाची सुई फिरल्याने या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले. आता अपर पोलीस अधीक्षकांच्या चौकशीतून नेमकी वस्तुस्थिती समोर येणार असून चौकशी अहवालानंतर आणखी काही मोठे निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.</p><p><strong>अवैध धंदे नेस्तनाबूत करण्याचे आदेश</strong></p><p>परभणी जिल्ह्यातील सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय मोडून काढण्यासाठी पोलीस यंत्रणेला स्पष्ट निर्देश देण्यात आले. अवैध वाळू वाहतूक, उत्खनन, जुगार, मटका, अवैध दारू विक्रीसह इतर बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे नांदेड परिक्षेत्र कार्यालयाने म्हटले आहे. अवैध व्यवसायांच्या निर्मूलनासाठी पोलीस प्रशासन कटीबद्ध असल्याचा पुनरुच्चारही करण्यात आला आहे. </p>]]></content:encoded></item><item><title>Gulabrao Patil | शिवसेना फुटीला आदित्य ठाकरेही जबाबदार; गुलाबराव पाटील यांचे विधान</title><link>https://pudhari.news/maharashtra/north-maharashtra/jalgaon/gulabrao-patil-blames-aaditya-thackeray-for-shiv-sena-split-political-controversy-ng81</link><comments>https://pudhari.news/maharashtra/north-maharashtra/jalgaon/gulabrao-patil-blames-aaditya-thackeray-for-shiv-sena-split-political-controversy-ng81#comments</comments><guid isPermaLink="false">8cae7407-10b6-48bd-a2e8-d5c1ac7a3a92</guid><pubDate>Thu, 18 Jun 2026 16:29:48 +0000</pubDate><atom:updated>2026-06-18T16:29:48.254Z</atom:updated><atom:author><atom:name>पुढारी वृत्तसेवा</atom:name><atom:uri>/api/author/1960322</atom:uri></atom:author><description></description><media:keywords>Shivsena,Aaditya Thackeray,gulabrao patil</media:keywords><media:content height="675" url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-01-25/3t20ujor/Monika-Banner-Image-1200-x-675-px-1200-x-675-px-2026-01-25T093704.265.jpg" width="1200"><media:title type="html"><![CDATA[ Gulabrao Patil ]]></media:title><media:description type="html"><![CDATA[ Gulabrao Patil ]]></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-01-25/3t20ujor/Monika-Banner-Image-1200-x-675-px-1200-x-675-px-2026-01-25T093704.265.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>जळगाव</category><content:encoded><![CDATA[ <p>शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसह शिवसेना फुटीबाबत मोठे वक्तव्य केले. एका विशेष मुलाखतीत बोलताना त्यांनी पक्ष फुटीमागे संजय राऊत यांच्यासोबतच आदित्य ठाकरे यांनाही जबाबदार धरले.</p><p>"बाळासाहेब ठाकरे यांनी उभे केलेले वैभव आणि शिवसेनेचा किल्ला जपण्याचे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. चार अक्षरांनी उभी राहिलेली शिवसेना अबाधित ठेवण्याचे कार्य ते करत आहेत," असे पाटील म्हणाले.</p><p>पक्ष सोडून गेलेले खासदार पुन्हा शिवसेनेत येतील का, याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांचाच असल्याचे सांगत, "ते जो निर्णय घेतील, त्याला सर्वांची मान्यता असेल," असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना फुटीची कारणे सांगताना पाटील म्हणाले, "लोकप्रतिनिधींना अपेक्षित महत्त्व दिले जात नव्हते. आमदारांच्या भावना आणि अडचणी वरिष्ठांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचत नव्हत्या."</p><p>आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले, "आम्ही आदित्य ठाकरे यांना राजकुमार समजत होतो. उद्धव ठाकरे आजारी असताना ते मंत्री होते. त्यांनी आमदारांच्या समस्या जाणून घेतल्या असत्या, त्यावर मार्ग काढला असता आणि त्या भावना पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवल्या असत्या, तर कदाचित ती परिस्थिती निर्माण झाली नसती."</p><p>संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीका केली. "त्यांच्या बोलण्यात आजही तारतम्य नाही. आमदार, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी पक्ष सोडून जात असताना केवळ आक्रमक वक्तव्य करून प्रश्न सुटत नाहीत," असे ते म्हणाले."रक्ताचे पाणी करून भगवा जिवंत ठेवणारी माणसे पक्षातून गेली. सोने परत मिळू शकते, पण अशी माणसे परत मिळत नाहीत," अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.</p><p>एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करताना पाटील म्हणाले, "शिवसेना कायम राहील, भगवा तेवत राहील आणि बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आमच्यासोबत असतील." उद्धव ठाकरे भविष्यात शिवसेनेत येतील का, या प्रश्नावर मात्र त्यांनी सावध भूमिका घेत, "यावर बोलण्याइतका मी मोठा नाही," असे उत्तर दिले.</p>]]></content:encoded></item><item><title>Parliament Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात एनडीए दिसणार भक्कम, ५४० सदस्यसंख्या असलेल्या लोकसभेत NDAचे संख्याबळ होणार ३२४</title><link>https://pudhari.news/national/parliament-monsoon-session-2026-nda-strength-reaches-324-in-lok-sabha-rg84</link><comments>https://pudhari.news/national/parliament-monsoon-session-2026-nda-strength-reaches-324-in-lok-sabha-rg84#comments</comments><guid isPermaLink="false">1e17edd7-33fa-41f8-8126-a5fdcecf00eb</guid><pubDate>Thu, 18 Jun 2026 16:28:13 +0000</pubDate><atom:updated>2026-06-18T16:28:13.902Z</atom:updated><atom:author><atom:name>पुढारी वृत्तसेवा</atom:name><atom:uri>/api/author/1960322</atom:uri></atom:author><description></description><media:keywords>Lok Sabha,Lok Sabha Session,monsoon parliament session</media:keywords><media:content height="2087" url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2025-11-22/t9sgkvhe/NPB16f59600db9.jpg" width="3710"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2025-11-22/t9sgkvhe/NPB16f59600db9.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>राष्ट्रीय</category><content:encoded><![CDATA[ <p><strong>नवी दिल्ली :</strong> संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात एनडीएचे शक्ती संतुलन विरोधकांवर वरचढ ठरणार आहे. एनडीएचा आकडा २९८ वरून ३२४ वर पोहोचणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांचे  विलीनीकरण झाल्यानंतर ही संख्या ३१८ झाली आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेतील फुटीला अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर या आकड्यात आणखी ६ ची भर पडेल. मात्र असे असूनही हा आकडा दोन तृतीयांश बहुमताला स्पर्श करू शकलेला नाही. परंतु, सत्ताधारी पक्षाला घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करून घेण्यासाठी आता पूर्वीच्या तुलनेत थोडी कमी कसरत करावी लागेल. दुसरीकडे, विरोधक आधीपेक्षा अधिक कमकुवत झाले आहेत. याचा थेट परिणाम संसदेच्या कामकाजावर दिसून येईल.</p><p>लोकसभेत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांकडे बहुमत तर आहे, परंतु घटनादुरुस्तीसारखी विधेयके मंजूर करण्यासाठी आवश्यक असणारे दोन तृतीयांश समर्थन आतापर्यंत त्यांच्याकडे नव्हते. याच कारणामुळे एप्रिलमध्ये सरकारने आणलेले संविधान (१३१ वी दुरुस्ती) विधेयक आवश्यक पाठिंबा मिळवू शकले नव्हते. त्यावेळी सरकारला २९८ खासदारांचा पाठिंबा मिळाला होता, तर घटनादुरुस्तीसाठी ३६० मतांची गरज होती. सध्या लोकसभेत ५४० सदस्य आहेत. तीन जागा रिक्त आहेत.</p><p>दुसरीकडे, राज्यसभेतही भाजपची स्थिती मजबूत झाली आहे. आम आदमी पक्षाचे सात सदस्य भाजपच्या गोटात आल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) संख्या वाढून १४८ वर पोहोचली आहे. हा आकडा दोन तृतीयांश बहुमतासाठी आवश्यक असलेल्या १६३ च्या जवळ मानला जात आहे.</p><h3>द्रमुकचाही पाठिंबा मिळवणार?</h3><p>तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि द्रमुक यांच्यातील संबंधांमध्ये दरी निर्माण झाली आहे. दोन्ही पक्ष वेगवेगळ्या वाटेने चालले आहेत. द्रमुकचे २२ खासदार आहेत. पूर्वी हे सर्व खासदार मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी (परिसीमन) संबंधित प्रस्तावांचे प्रखर विरोधक राहिले आहेत. लोकसंख्येच्या आधारावर जागांच्या पुनर्रचनेमुळे दक्षिण भारतातील राज्यांचा प्रभाव कमी होईल आणि उत्तर भारतातील राज्यांना अधिक फायदा होईल, असा त्यांचा युक्तिवाद होता. परंतु बदललेल्या परिस्थितीत द्रमुकची मनधरणी करणे सत्ताधारी पक्षासाठी सोपे जाऊ शकते. </p><h3>विरोधकांतील दरी पथ्यावर</h3><p>घटनादुरुस्ती विधेयकावरील मतदानादरम्यान त्यांची अनुपस्थिती सत्ताधाऱ्यांचा मार्ग सुकर करू शकते. सध्या एनडीए कडे स्वबळावर घटनादुरुस्ती करण्यासाठी पुरेशी संख्या नाही. परंतु विरोधकांतील वाढणाऱ्या दरीने संसदेचे गणित बदलून टाकले आहे.</p> ]]></content:encoded></item><item><title>India UK Trade Deal : ब्रिटनच्या ३.७८ लाख मोटारींना आयात शुल्कात सवलत मिळणार, येत्या १५ जुलैपासून कराराची अंमलबजावणी</title><link>https://pudhari.news/national/india-allows-378000-uk-cars-at-concessional-duty-under-trade-pact-rg84</link><comments>https://pudhari.news/national/india-allows-378000-uk-cars-at-concessional-duty-under-trade-pact-rg84#comments</comments><guid isPermaLink="false">abb2892e-2795-420f-88fc-0c20652f415e</guid><pubDate>Thu, 18 Jun 2026 16:02:52 +0000</pubDate><atom:updated>2026-06-18T16:02:52.555Z</atom:updated><atom:author><atom:name>पुढारी वृत्तसेवा</atom:name><atom:uri>/api/author/1960322</atom:uri></atom:author><description></description><media:keywords>automobile industry</media:keywords><media:content height="675" url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/9cvdp4t3/India-UK-automobile-trade-deal.jpg" width="1200"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/9cvdp4t3/India-UK-automobile-trade-deal.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>राष्ट्रीय</category><category>आंतरराष्ट्रीय</category><content:encoded><![CDATA[ <p><strong>नवी दिल्ली :</strong> पारंपरिक इंजिन असलेल्या ब्रिटनच्या कारला सवलतीच्या आयात शुल्कामध्ये भारतात प्रवेश दिला जाणार आहे. पुढील १५ वर्षात ३.७८ लाख कार सवलतीच्या दरात भारतीय बाजारपेठेत येतील. सर्वच श्रेणीतील कारचा यात समावेश असला तरी देशांतर्गत कारची बाजारपेठ सुरक्षित राहील, याची काळजी करारामध्ये घेण्यात आली आहे. येत्या १५ जुलैपासून या कराराची अंमलबजावणी होणार आहे.</p><p>सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार कराराअंतर्गत (सीईटीए) भारताने ब्रिटनमधून येणाऱ्या वाहनांवरील कर ११० वरून १० टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. विविध कारच्या श्रेणीनुसार कररचना करण्यात आली आहे. भारत-ब्रिटनमधील करारानुसार भारताला ब्रिटनच्या इलेक्ट्रिक, हायब्रिड आणि हायड्रोजनवर चालणाऱ्या प्रवासी कारच्या बाजारपेठेत प्रवेश मिळेल. याअंतर्गत, २० ते ८० हजार ब्रिटिश पाऊंड किंमत श्रेणीतील कार्सची त्या देशात शुल्कमुक्त निर्यात करता येईल. यासाठीचा एकूण कोटा सहाव्या वर्षापासून सुरू होऊन १५ व्या वर्षापर्यंत ८८ हजार युनिटस्‌च्या कमाल मर्यादेपर्यंत पोहोचेल. त्यानंतरच्या वर्षांतही हा आकडा कायम राहील.</p><h3>इलेक्ट्रिक कारची आयात सशुल्क</h3><p>कराराच्या अंमलबजावणीपासून पहिली पाच वर्षे इलेक्ट्रिक, हायब्रिड, हायड्रोजन या कारला भारताने आयात शुल्कात सवलत दिलेली नाही. कराराच्या अंमलबजावणीपासून सहाव्या वर्षी ४० ते ८० हजार पाऊंड किमतीच्या वाहनांवरील शुल्क ५० टक्क्यांवर आणले जाईल. त्याचा कोटा चारशे इतका असेल. तसेच ८० हजार पाऊंडवरील कारचे शुल्क ४० टक्क्यांवर आणले जाईल. या श्रेणीतील ४ हजार कारला सवलतीच्या दरात प्रवेश मिळेल.</p>]]></content:encoded></item><item><title>Monsoon update | मान्सूनने हुलकावणी दिली, पण २५ जून पासून सक्रीय होणार! </title><link>https://pudhari.news/maharashtra/pune/maharashtra-monsoon-update-stalled-rain-to-revive-and-cover-state-from-june-25-imd-prediction-ng81</link><comments>https://pudhari.news/maharashtra/pune/maharashtra-monsoon-update-stalled-rain-to-revive-and-cover-state-from-june-25-imd-prediction-ng81#comments</comments><guid isPermaLink="false">83763d7a-6ba3-4e57-a387-9ff0e24e52cb</guid><pubDate>Thu, 18 Jun 2026 15:53:28 +0000</pubDate><atom:updated>2026-06-18T15:53:28.030Z</atom:updated><atom:author><atom:name>पुढारी वृत्तसेवा</atom:name><atom:uri>/api/author/1960322</atom:uri></atom:author><description></description><media:keywords>Monsoon forecast,rain update</media:keywords><media:content height="675" url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/i1pecj3l/pudhari-photo-61.jpg" width="1200"><media:title type="html"><![CDATA[ monsoon update]]></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/i1pecj3l/pudhari-photo-61.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>पुणे</category><content:encoded><![CDATA[ <p><strong>पुणे:</strong> मान्सूनने जून महिन्यातील सुमारे १८ दिवस हुलकावणी दिली.अजून पुढचे सहा दिवस तो बरसणार नाही.मात्र २५ जून ते १ जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे.तो चांगला सक्रीय होणार आहे. असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. </p><p>गुरुवारी रात्री उशीरा भारतीय हवामान विभागाने २५ जून  ते १ जुलै दरम्यान देशातील मान्सून बाबतचा अंदाज जाहिर केला. देशात १८ जून पर्यंत ३८ टक्के सरासरी पाऊस घटल्याचे जाहिर केले.सर्वात कमी पाऊस मध्य भारतात ज्यात महाराष्ट्राचा समावेश आहे तेथे तब्बल ६२ टक्के कमी झाल्याचे सांगितले आहे.</p><p><strong>असा आहे अंदाज...(२५ जून ते १ जुलै २०२६)</strong></p><p>- मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. </p><p>-मान्सून वारे मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, ओडिशा, झारखंड, बिहार, तसेच उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश,उत्तर प्रदेशच्या काही भागांत पुढे सरकतील.</p><p>-हंगामी 'ट्रफ' (कमी दाबाचा पट्टा) त्याच्या सामान्य स्थितीजवळ राहण्याची शक्यता आहे; मात्र २५ जूननंतर त्याचे पूर्वेकडील टोक दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता आहे.</p><p>-'सोमाली जेट' (कमी उंचीवरील सोमाली जेट प्रवाह) अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दक्षिण अरबी समुद्रावरील विषुववृत्त-ओलांडणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहात वाढ होईल.</p><p>-मध्य आणि द्वीपकल्पीय भारतावर वातावरणाच्या खालच्या थरात (ट्रोपोस्फिअरच्या खालच्या भागात) पश्चिमेकडील वाऱ्यांचे (वेस्टर्लीजचे) वर्चस्व राहण्याची शक्यता आहे.</p><p>- मध्य अरबी समुद्रावर वातावरणाच्या मध्यम उंचीवर (मध्य ट्रोपोस्फिअरमध्ये) चक्राकार वारे (सायक्लोनिक सर्क्युलेशन) निर्माण होण्याची शक्यता आहे.</p><p>-पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत 'पूर्व-पश्चिम शिअर झोन' (वाऱ्यांच्या वेगातील किंवा दिशेतील बदलाचा पट्टा) विस्तारण्याची शक्यता आहे.</p>]]></content:encoded></item><item><title>Beed News : पगार घाटेवाडीत, काम दुसऱ्या शाळेत! संतप्त गावकऱ्यांनी शाळेला ठोकले कुलूप
</title><link>https://pudhari.news/maharashtra/marathwada/beed/beed-news-ghatewadi-zilla-parishad-school-locked-by-parents-from-four-days-in-kej-dc95</link><comments>https://pudhari.news/maharashtra/marathwada/beed/beed-news-ghatewadi-zilla-parishad-school-locked-by-parents-from-four-days-in-kej-dc95#comments</comments><guid isPermaLink="false">043acce5-2bf9-4ef6-86a8-fd4ac92953c2</guid><pubDate>Thu, 18 Jun 2026 15:50:54 +0000</pubDate><atom:updated>2026-06-18T15:50:54.596Z</atom:updated><atom:author><atom:name>पुढारी वृत्तसेवा</atom:name><atom:uri>/api/author/1960322</atom:uri></atom:author><description></description><media:keywords>beed news,Beed News Update,Zilla Parishad School</media:keywords><media:content height="675" url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/qkfp7sus/Copy-of-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-2026-06-18T211832.260.jpg" width="1200"><media:title type="html"><![CDATA[ जिल्हा परिषद शाळा]]></media:title><media:description type="html"><![CDATA[ जिल्हा परिषद शाळा]]></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/qkfp7sus/Copy-of-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-2026-06-18T211832.260.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>बीड</category><content:encoded><![CDATA[ <p><strong>केज :</strong> घाटेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा कार्यरत शिक्षक दुसऱ्या शाळेवर कार्यरत असल्याने त्या शिक्षकासाठी ग्रामस्थांनी मागील तीन दिवसांपासून शाळा बंद ठेवली आहे.</p><p>घाटेवाडी येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शाळा असून संचमान्यतेनुसार सहा शिक्षकाची पदे मंजूर आहेत. सध्या शाळेवर एक मुख्याध्यापक आणि चार शिक्षक कार्यरत आहेत. तर शाळेत १३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एका रिक्त शिक्षकाचे पद भरले. त्या शिक्षकाचा पगार या शाळेतून काढला जात असताना तो शिक्षक दुसऱ्या शाळेवर कामकाज करीत आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद शिंदे व गावकऱ्यांनी या शिक्षकास शाळेवर पाठविण्यात यावे, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे शाळा भरण्यापूर्वी केली होती.</p><p>मात्र, शिक्षण विभागाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत शिक्षकास शाळेवर पाठविले नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या पालकांनी सदरील शिक्षक शाळेवर पाठवा, अन्यथा आमच्या मुलांचे टीसी आम्हाला द्या, अशी मागणी लावून धरल्याने पहिल्या दिवसांपासून शाळा भरली नसून शाळेला कुलूप आहे. दरम्यान, चार दिवसांपासून शाळा बंद असताना शिक्षण विभागाचे अधिकारी फिरकले देखील नाहीत.</p>]]></content:encoded></item><item><title>Gold Imports : सोन्याच्या आयातीत ७० टक्क्यांनी घट, मे महिन्यात आयात घटून २५-३० टनांवर</title><link>https://pudhari.news/national/india-gold-imports-drop-70-percent-in-may-fall-to-25-to-30-tonnes-amid-weak-demand-rg84</link><comments>https://pudhari.news/national/india-gold-imports-drop-70-percent-in-may-fall-to-25-to-30-tonnes-amid-weak-demand-rg84#comments</comments><guid isPermaLink="false">25d455e6-cdf1-4b03-b0b4-64d84eda3d41</guid><pubDate>Thu, 18 Jun 2026 15:44:00 +0000</pubDate><atom:updated>2026-06-18T15:44:00.182Z</atom:updated><atom:author><atom:name>पुढारी वृत्तसेवा</atom:name><atom:uri>/api/author/1960322</atom:uri></atom:author><description></description><media:keywords>gold</media:keywords><media:content height="675" url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-04-02/u6ygepb3/Gold-Silver-Jewellery-Imports-2.jpg" width="1200"><media:title type="html"><![CDATA[ Gold]]></media:title><media:description type="html"><![CDATA[ Gold]]></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-04-02/u6ygepb3/Gold-Silver-Jewellery-Imports-2.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>राष्ट्रीय</category><content:encoded><![CDATA[ <p><strong>नवी दिल्ली :</strong> सोन्यावरील आयात शुल्क दुपटीहून अधिक वाढविल्यानंतर आयातीत मोठी घसरण झाली आहे. आता दरमहा सोने आयात ७० ते १०० वरून २५ ते ३० टनांवर घसरली असल्याची माहिती केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली.</p><p>मौल्यवान धातूंची आयात रोखणे, परकीय चलन साठ्यावरील ताण कमी करणे आणि आयातीवरील मोठ्या खर्चाचा परिणाम कमी करणे या उद्देशाने सरकारने सोन्यावरील आयात शुल्क ६ टक्केवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. सोन्याच्या किमतीतील वाढ, दागिन्यांची कमी झालेली मागणी आणि जागतिक स्तरावर सोन्याचा पुनर्वापर (रिसायकलिंग) वाढणे यांसारख्या घटकांमुळेही सोन्याच्या आयातीत घट झाली आहे.</p><p>केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या व्यापार आकडेवारीनुसार, एप्रिल २०२६ मध्ये सोन्याची आयात सुमारे ५.६३ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. शुल्क वाढीनंतर मे २०२६ मध्ये ती घसरून सुमारे ३.४२ अब्ज डॉलरवर आली आहे.</p><p>सूत्राने सांगितले की, सोन्याच्या वाढलेल्या किमतींमुळे दागिन्यांची मागणीही मंदावली आहे. तर जागतिक स्तरावर सोन्याचा पुनर्वापर वाढला आहे.</p>]]></content:encoded></item><item><title>Chandrapur GST Bhavan | चंद्रपूरच्या करसामर्थ्याला नवे बळ; ३० कोटींच्या जीएसटी भवनाचे लोकार्पण</title><link>https://pudhari.news/maharashtra/vidarbha/chandrapur/chandrapur-news-devendra-fadnavis-inaugurates-new-gst-bhavan-built-at-cost-of-30-crores-ng81</link><comments>https://pudhari.news/maharashtra/vidarbha/chandrapur/chandrapur-news-devendra-fadnavis-inaugurates-new-gst-bhavan-built-at-cost-of-30-crores-ng81#comments</comments><guid isPermaLink="false">7365cc30-1e1b-414a-8e81-97fe1202d463</guid><pubDate>Thu, 18 Jun 2026 15:42:54 +0000</pubDate><atom:updated>2026-06-18T15:42:54.856Z</atom:updated><atom:author><atom:name>पुढारी वृत्तसेवा</atom:name><atom:uri>/api/author/1960322</atom:uri></atom:author><description></description><media:keywords>chandrapur,GST,GST Act</media:keywords><media:content height="675" url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/2d5zoxsk/pudhari-photo-59.jpg" width="1200"><media:title type="html"><![CDATA[ Chandrapur GST Bhavan]]></media:title><media:description type="html"><![CDATA[ Chandrapur GST Bhavan]]></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/2d5zoxsk/pudhari-photo-59.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>चंद्रपूर</category><content:encoded><![CDATA[ <p><strong>चंद्रपूर  :</strong> राज्य वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाच्या सुमारे ३० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण गुरुवारी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जीएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. </p><p>लोकार्पण सोहळ्यास वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, करण देवतळे, महापौर संगीता खांडेकर, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, अपर राज्यकर आयुक्त विजय डांगे, राज्यकर सहआयुक्त विनोद गवई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.</p><p>यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ जुलै २०१७ रोजी देशात जीएसटी प्रणाली लागू करून करव्यवस्थेत मोठी सुधारणा घडवून आणली. या एकात्मिक करप्रणालीमुळे कर भरण्याची प्रक्रिया सुलभ झाली असून देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होत असून राज्य विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, असे त्यांनी सांगितले.</p><p>राज्यकर सहआयुक्त विनोद गवई यांनी प्रास्ताविकात सांगितले की, चार मजली या नव्या इमारतीसाठी २९ कोटी ९९ लाख ८० हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. चंद्रपूर विभागाचे मुख्यालय म्हणून या इमारतीतून चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांचे कामकाज पाहिले जाणार आहे.</p><p>चंद्रपूर विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सुमारे १,४५० कोटी रुपयांचा जीएसटी महसूल जमा केला आहे. महसूल संकलनातील लक्ष्यपूर्तीत १२२ टक्के कामगिरी नोंदवत विभागाने राज्यात द्वितीय क्रमांक मिळविल्याची माहितीही त्यांनी दिली.</p><p>कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर फीत कापून नव्या इमारतीची पाहणी करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन दिनेश मासोदकर आणि ऐश्वर्या भालेराव यांनी केले.</p><figure><img alt="" src="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/7wix6cbg/pudhari-photo-60.jpg" /></figure><p><strong>देशाच्या विकासात चंद्रपूरचा सिंहाचा वाटा : ॲड. आशिष जयस्वाल</strong></p><p>वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे आर्थिक महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, उद्योग, खनिजसंपदा आणि वनसंपदेने समृद्ध असलेला चंद्रपूर जिल्हा राज्याच्या महसूल वाढीत मोलाचे योगदान देत आहे. देश आणि महाराष्ट्राच्या विकासात या जिल्ह्याचा सिंहाचा वाटा आहे.</p><p>‘विकसित भारत-२०४७’ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध असून चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहेत. नव्या जीएसटी भवनामुळे कर प्रशासन अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.</p><p><strong>अन् पालकमंत्र्यांनी मागीतली माफी</strong></p><p>आजच्या कार्यक्रमात डॉ. जयस्वाल आणि पालकमंत्री उईके यांनाच बोलण्याची संधी  मिळाली. उपस्थित लोकप्रतिनीधींना बोलण्याची संधी मिळाली नाही. यावर बोलतांना पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले की, ’एखाद्या कार्यक्रमाला उशीर होत असेल, तर कार्यक्रम वेळेत सुरू करावा आणि उशिरा येणाऱ्या पाहुण्यांनी त्यांच्या सोयीनुसार यावे, अशी माझी भूमिका राहिली आहे. मात्र आजच्या कार्यक्रमात आमदार, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींना बोलण्याची संधी मिळाली नाही, याची खंत वाटते. लोकप्रतिनिधी हे जनतेचे प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे त्यांनाही आपले मत मांडण्याची संधी मिळायला हवी. आजच्या कार्यक्रमात काही त्रुटी राहिल्या असतील, तर त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी सर्वांना न्याय देण्याची आणि सर्वांचा सन्मान राखण्याची आहे. त्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या असतील, त्यांची मी क्षमा मागतो.’ असे बोलून त्यांनी उपस्थित लोकप्रतिनीधींची माफी मागीतली.</p>]]></content:encoded></item><item><title>Russia-Ukraine war | युक्रेनने रशियावर डागले हजार ड्रोन</title><link>https://pudhari.news/international/ukraine-launches-largest-drone-attack-on-russia-war-ap84</link><comments>https://pudhari.news/international/ukraine-launches-largest-drone-attack-on-russia-war-ap84#comments</comments><guid isPermaLink="false">c7841ec4-55a6-4d92-a33d-710095f04898</guid><pubDate>Thu, 18 Jun 2026 15:40:13 +0000</pubDate><atom:updated>2026-06-18T15:40:13.280Z</atom:updated><atom:author><atom:name>पुढारी वृत्तसेवा</atom:name><atom:uri>/api/author/1960322</atom:uri></atom:author><description><![CDATA[ Russia-Ukraine war | युक्रेनने रशियावर डागले हजार ड्रोन]]></description><media:keywords>Russia-Ukraine War</media:keywords><media:content height="675" url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2025-06-10/9wx3qp4k/rassia.jpg" width="1200"><media:title type="html"><![CDATA[ Russia Ukraine War]]></media:title><media:description type="html"><![CDATA[ Russia Ukraine War]]></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2025-06-10/9wx3qp4k/rassia.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>आंतरराष्ट्रीय</category><content:encoded><![CDATA[ <p><strong>मॉस्को/कीव्ह; वृत्तसंस्था :</strong> रशिया-युक्रेन युद्धाला नवे वळण देत युक्रेनने गुरुवारी रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला चढविला. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानुसार रात्रभरात युक्रेनकडून डागण्यात आलेले सुमारे १,००० ड्रोन आणि चार क्रूझ क्षेपणास्त्रे पाडण्यात आली. यापैकी जवळपास २०० ड्रोन रशियाची राजधानी मॉस्कोच्या दिशेने डागली होती. </p><p>या हल्ल्यात दक्षिण रशियातील रोस्तोव प्रांतातील एक महत्त्वाचा तेलसाठा (ऑइल डेपो) भीषण स्फोटानंतर उद्ध्वस्त झाला. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय मॉस्कोमधील कपोतन्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर (रिफायनरी) देखील हल्ला करण्यात आला. स्फोट इतका तीव्र होता की, तेलसाठ्याच्या टाकीचे झाकण अनेक मीटर उंच हवेत उडाले आणि परिसरात काळ्या धुराचे प्रचंड लोट पसरले. हल्ल्यानंतर जवळील एका शॉपिंग सेंटरलाही आग लागल्याची माहिती समोर आली आहे.</p><p>ड्रोनचे अवशेष कोसळल्याने काही निवासी आणि व्यावसायिक इमारतींचे नुकसान झाले. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक उंच इमारती रिकाम्या करण्यात आल्या, तर मॉस्कोतील काही विमानतळांवरील उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली. हल्ल्यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे कझान येथे दक्षिण-पूर्व आशियाई देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होते. मात्र, या हल्ल्याबाबत त्यांनी अद्याप कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही.</p><h3>युक्रेन जळत असेल तर रशियाही जळेल : झेलेन्स्की</h3><p>युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत तो कीव्हवरील रशियन हल्ल्यांना दिलेले प्रत्युत्तर असल्याचे म्हटले. "युक्रेन जळत असेल तर मॉस्कोही जळेल," असे विधान करत त्यांनी रशियाच्या युद्धयंत्रणेला पाठबळ देणाऱ्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचे स्पष्ट केले. तसेच युद्ध संपवण्यासाठी रशियाने आता राजनैतिक मार्ग स्वीकारावा, असे आवाहनही त्यांनी केले.</p>]]></content:encoded></item><item><title>Chandrapur News | कुंटणखान्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बिअर बारचा परवाना कायमचा रद्द</title><link>https://pudhari.news/maharashtra/vidarbha/chandrapur/chandrapur-news-prostitution-racket-busted-at-beer-bar-license-permanently-cancelled-by-collector-ng81</link><comments>https://pudhari.news/maharashtra/vidarbha/chandrapur/chandrapur-news-prostitution-racket-busted-at-beer-bar-license-permanently-cancelled-by-collector-ng81#comments</comments><guid isPermaLink="false">d1b415dc-3b9d-4cd2-a1ce-3472a08500fa</guid><pubDate>Thu, 18 Jun 2026 15:36:14 +0000</pubDate><atom:updated>2026-06-18T15:36:14.028Z</atom:updated><atom:author><atom:name>पुढारी वृत्तसेवा</atom:name><atom:uri>/api/author/1960322</atom:uri></atom:author><description></description><media:keywords>chandrapur,chandrapur crime</media:keywords><media:content height="675" url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-03-31/1x44ylvf/Sgnp-2026-03-31T125646.443.jpg" width="1200"><media:title type="html"><![CDATA[  Bar Ban]]></media:title><media:description type="html"><![CDATA[ Bar Ban]]></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-03-31/1x44ylvf/Sgnp-2026-03-31T125646.443.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>चंद्रपूर</category><content:encoded><![CDATA[ <p><strong>चंद्रपूर  :</strong> चिमुर शहरातील आझाद वॉर्ड परिसरात असलेल्या वनिता बिअर बार अॅण्ड रेस्टॉरंटच्या नावाखाली सुरू असलेल्या देहव्यवसायाविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर अखेर संबंधित बिअर बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी १६ जून २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण आदेश पारित केला आहे.  </p><p>चिमुर येथील आझाद वॉर्ड येथील वनिता बिअर बार अॅण्ड रेस्टॉरंटची संचालिका वनिता जगन रंगारी ही बारच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर बाहेरील महिलांकडून देहव्यवसाय करून घेत आहे. महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेतला जात असून, ग्राहकांकडून मिळणाऱ्या रकमेतील मोठा हिस्सा स्वतःकडे ठेवून संबंधित महिलांचे आर्थिक शोषण केले जात असल्याची गोपनीय माहिती&nbsp;&nbsp;१६ मे २०२६ रोजी पोलिसांना मिळाली होती की.या माहितीच्या आधारे&nbsp;&nbsp;पोलिसांनी खाजगी ग्राहक पाठवून सापळा रचला. त्यानंतर बिअर बारवर छापा टाकण्यात आला असता तेथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आले. कारवाईदरम्यान एका पीडित महिलेला मुक्त करण्यात आले.</p><p>महिला पोलीस उपनिरीक्षक दीप्ती मरकाम यांच्या तक्रारीवरून चिमुर पोलीस ठाण्यात आरोपी वनिता रंगारी हिच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ५०५/२०२६ नोंद करण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम १४३ (२) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम, १९५६ (पीटा अॅक्ट) मधील कलम ३, ४, ५, ६ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला चंद्रपूर कारागृहात न्यायालयीन कोठडीसाठी पाठविले.</p><p>विशेष म्हणजे हा बिअर बार अत्यंत दाट लोकवस्तीच्या भागात आहे. बारच्या परिसरात तीन मशिदी आणि एक बुद्ध विहार अशी महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत. तसेच येथे येणाऱ्या-जाणाऱ्या ग्राहकांमुळे परिसरातील महिला, मुली व प्रतिष्ठित नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. स्थानिक नागरिकांनी हा बिअर बार बंद करण्यासाठी अनेकदा प्रशासनाकडे लेखी निवेदने सादर केली होती.</p><p>तपासादरम्यान वनिता रंगारी ही बिअर बारच्या नावाखाली प्रत्यक्षात कुंटणखाना चालवत असल्याचे आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांचे शोषण करत असल्याचे पुराव्यानिशी स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी नमूद केले. तसेच धार्मिक स्थळांच्या अगदी जवळ अशा प्रकारचा व्यवसाय सुरू असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक दिनेश त्र्यंबक लबडे यांनी सखोल व अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी संबंधित प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला.</p><p>जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत अबकारी विभागाकडूनही स्वतंत्र वस्तुस्थिती अहवाल मागविला. अबकारी विभागाचा अहवालही पोलिसांच्या निष्कर्षांना पूरक असल्याचे आढळून आले. त्यानंतर वनिता रंगारी हिच्या नावावरील बिअर बार परवाना (अनुज्ञप्ती क्रमांक FL-III-446) कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.</p>]]></content:encoded></item><item><title>Beed News : गेवराईतील वाळू घोटाळा प्रकरणी तहसीलदारांसह प्रमुख सूत्रधारांवर गुन्हे दाखल करा</title><link>https://pudhari.news/maharashtra/marathwada/beed/gevrai-news-godavari-bachao-committee-demands-fir-against-tehsildar-in-sand-scam-case-dc95</link><comments>https://pudhari.news/maharashtra/marathwada/beed/gevrai-news-godavari-bachao-committee-demands-fir-against-tehsildar-in-sand-scam-case-dc95#comments</comments><guid isPermaLink="false">afdd200c-8068-4b36-adf0-68c1ffc3179c</guid><pubDate>Thu, 18 Jun 2026 15:30:20 +0000</pubDate><atom:updated>2026-06-18T15:30:20.508Z</atom:updated><atom:author><atom:name>पुढारी वृत्तसेवा</atom:name><atom:uri>/api/author/1960322</atom:uri></atom:author><description></description><media:keywords>beed news,Beed News Update,Illegal sand mining</media:keywords><media:content height="720" url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/68lixea1/0519b566-f4a9-42e4-8255-09c70fa968d8.jpg" width="1280"><media:title type="html"><![CDATA[ गेवराईतील वाळू घोटाळा प्रकरणी 'गोदावरी बचाव सर्व पक्षीय कृती समिती' च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
]]></media:title><media:description type="html"><![CDATA[ Beed News]]></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/68lixea1/0519b566-f4a9-42e4-8255-09c70fa968d8.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>बीड</category><content:encoded><![CDATA[ <p><strong>गेवराई :</strong> गेवराई तालुक्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. याबाबत गोदावरी बचाव सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि.१८) जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन सादर करत या प्रकरणातील प्रमुख आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, या निवेदनात तहसीलदार संदीप खोमणे यांना मुख्य आरोपी घोषित करून त्यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या महसूल घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.</p><p>गेवराई तालुक्यात परवाना नसताना मोठ्या प्रमाणावर वाळू उत्खनन व वाहतूक करण्यात आली. या अवैध प्रकारामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला असून, संबंधित यंत्रणांनी वेळेवर कारवाई न केल्याने हा प्रकार अधिक बळावल्याचा आरोप गोदावरी बचाव सर्व पक्षीय कृती समितीने केला आहे. अवैध वाळू उत्खनन, वाहतूक आणि साठवणूक याबाबत वारंवार तक्रारी होऊनही संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी ठोस कारवाई केली नाही. उलट काही अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळेच हा घोटाळा वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे तहसीलदार संदीप खोमणे यांच्यावर मुख्य सूत्रधार म्हणून गुन्हा दाखल करा, तसेच चकलंबा पोलीस स्वतः यात हप्ता घेत असल्याने आणि त्याचा पोलीस कर्मचारी सध्या या गुन्हात आरोपी असल्यामुळे हा तपास चकलंबा पोलीसांकडून काढून घेण्यात यावा, आणि या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी एसआयटी किंवा आर्थिक गुन्हे शाखामार्फत तपास करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.</p><p>तसेच महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि वाळू माफिया यांच्यातील कथित आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. विना नंबर हायावा वाहतूक सरास चालू आहे. त्यामुळे आरटीओ जिल्हा ट्राफिक शहरचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, या सह मोठ्या प्रमाणात महसूल बुडाल्याचा आरोप वेदनात नमूद केल्याप्रमाणे, अवैध वाळू उत्खननामुळे शासनाच्या सुमारे १०० कोटी रुपयांहून अधिक महसुलाचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून नुकसानभरपाई वसूल करावी, अशीही मागणी गोदावरी बचाव सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. त्याचबरोबर अवैध वाळू वाहतुकीदरम्यान घडलेल्या अपघातांमुळे काही निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याचा मुद्दाही समितीने उपस्थित केला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ महसूल घोटाळा म्हणून न पाहता, सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित गंभीर विषय म्हणून तपास करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे.</p><p>या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महसूल मंत्री, विभागीय आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या असून, लवकरात लवकर कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही 'गोदावरी बचाव सर्व पक्षीय कृती समिती'ने दिला आहे.</p>]]></content:encoded></item><item><title>Donkey Marriage for rain | पाऊस पडावा म्हणून गाढवाचं लग्न का लावतात? काय आहे प्रथा जाणून घ्या! </title><link>https://pudhari.news/features/donkey-marriage-for-rain-tradition-and-scientific-reasons-behind-this-unique-ritual-ng81</link><comments>https://pudhari.news/features/donkey-marriage-for-rain-tradition-and-scientific-reasons-behind-this-unique-ritual-ng81#comments</comments><guid isPermaLink="false">39113a78-afe3-4914-9b70-b4cfdfffe748</guid><pubDate>Thu, 18 Jun 2026 15:28:04 +0000</pubDate><atom:updated>2026-06-18T15:28:04.106Z</atom:updated><atom:author><atom:name>Namdev Gharal</atom:name><atom:uri>/api/author/2098072</atom:uri></atom:author><description></description><media:keywords>monsoon,Drought,Donkey</media:keywords><media:content height="675" url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/62joaqsj/pudhari-photo-58.jpg" width="1200"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/62joaqsj/pudhari-photo-58.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>फीचर्स</category><category>अपडेट्स</category><content:encoded><![CDATA[ <p><strong>Donkey Marriage for rain</strong>  सध्या महाराष्ट्रात मान्सून लांबला आहे, मृग नक्षत्र कोरडेच गेले असून  पाण्याअभावी पिके कोमेजू लागली आहे. तर अनेक शहरांमध्ये पाणी टंचाई सुरु झाली आहे. उपसाबंदीमुळे शेतीसाठी पाणी मिळेना झाले आहे, बोअरवेल, विहीरी कोरड्या पडल्या आहेत. यामुळे दुष्काळाची चाहूल लागली आहे, यावेळी महाराष्ट्रातील एक प्रथा समोर येथे, सोलापूर, सांगली या जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाऊस पडावा म्हणून गाढवाचं लग्न लावले जाते. अगदी माणसांच्या लग्नात ज्या प्रथा विधी असतात त्‍या या गाढवाच्या लग्नात केल्या जातात. तर ही प्रथा का पडली, खरचं पाऊस पडतो का की अंधश्रद्धा आहे हे पाहू. </p><p>पाऊसाने ओढ दिली की बळीराजाला आपल्या पिकांची संसाराची काळजी लागते. पाऊस पडावा यासाठी देवाला साकडे घातले जाते यातच गाढवाचंही लग्न लावले जाते.  विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यांमध्ये अनेक वर्षांपासून चालत आलेली एक पारंपरिक लोकप्रथा आहे. जेव्हा कडक उन्हाळा असतो, दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते आणि मान्सून लांबतो, तेव्हा वरुण राजाला  प्रसन्न करण्यासाठी हा अजब उपाय केला जातो.</p><p><strong>काय आहेत धार्मिक समजुती </strong></p><p><strong>वरुण राजाला प्रसन्न करणे:</strong> जुन्या समजुतीनुसार, गाढवाचं लग्न लावून दिल्यामुळे पावसाचा देवता 'वरुण राजा' प्रसन्न होतो किंवा त्याला दया येते आणि तो पृथ्वीवर पाऊस पाडतो, अशी ग्रामीण भागात श्रद्धा आहे. </p><p><strong>संकट निवारण:</strong> दुष्काळ हे एक मोठे संकट मानले जाते. अशा वेळी काहीतरी वेगळं किंवा विचित्र कृत्य करून निसर्गाचं लक्ष वेधून घेण्याचा हा एक पारंपरिक प्रयत्न असतो, जेणेकरून ते संकट टळावे. </p><p><strong>खऱ्याखुऱ्या लग्नासारखेच केले जातात विधि</strong></p><p>या लग्नासाठी एक नर आणि एक मादी गाढव निवडले जाते. त्यांना स्वच्छ धुवून, कपडे, फुलांचे हार आणि दागिने घालून वधू-वरासारखे सजवले जाते.  गावातून बँडबाजा किंवा ढोल-ताशांच्या गजरात गाढवांची मिरवणूक (वरात) काढली जाते.  ब्राह्मण किंवा गावातील ज्येष्ठ मंडळी गोळा होऊन मंत्रोच्चारात हे लग्न लावतात. उपस्थित लोक गाढवांवर अक्षता टाकतात. काही ठिकाणी लग्न झाल्यावर गावकऱ्यांसाठी जेवणाचाही बेत ठेवला जातो. </p> <p><strong> इतर प्राण्यांऐवजी गाढवाचंच लग्न का?</strong></p><p>शेतकऱ्याकडे बैल गाय, म्हैस रेडा, बकरी, शेळी असे अनेक प्राणी असतात पण पाऊस पडावा म्हणून गाढवाचंच लग्न का केले जाते.  गाढव हा प्राणी कष्ट, सहनशीलता आणि मूक वेदनेचे प्रतीक मानला जातो. अत्यंत कठीण परिस्थितीतही तो शांत राहून काम करतो. गावकऱ्यांच्या समजुतीनुसार, निसर्गाच्या कोपामुळे मानवासोबतच या मुक्या प्राण्यालाही पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे, हे दाखवण्यासाठी गाढवाची निवड केली जाते. </p><p><strong>विज्ञानाच्या दृष्टीने ही पूर्णपणे अंधश्रद्धा</strong></p><p>वैज्ञानिक दृष्टीकोणाचा विचार केला तर पाऊस पडणे ही भौगोलिक स्थितीवरव अवलंबून असते. जागतिक हवामानाचा परिणाम पावसावर होत असतो. तापमान वाढ, वादळ, बाष्पीभवन, हवेची दिशा इत्‍यादी अनेक घटक पावसासाठी कारणीभूत असतात  त्‍यामुळे गाढवाचं लग्न ही पूर्णपणे एक अंधश्रद्धा ठरते.  पण ग्रामीण भागात आजही पावसाची चातकासारखी वाट पाहणारे शेतकरी निसर्गाला साकडे घालण्यासाठी आणि मनाच्या समाधानासाठी ही लोकश्रद्धा किंवा प्रथा आनंदाने साजरी करतात. </p><p>इतर अनेक प्रथाही साजऱ्या केल्या जाता यामध्ये बेडकाचे लग्न, धोंडोबा किंवा धोंडीची पूजा, महादेवाला पाण्याचा अभिषेक (जलाभिषेक) भगवान शिव हे निसर्गाचे नियंत्रक मानले जातात. त्यामुळे पाऊस पडावा म्हणून शिवमंदिरांमध्ये विशेष विधी केले जातात. इत्‍यादी प्रथा पावसाला साकडे घालण्यासाठी केल्या जातात.</p><p><strong>यंदाच्या पावसावर ‘अल-निनो’ चे सावट</strong></p><p>हवामान तज्ञांच्या मते यंदा भारताच्या मान्सूनवर अल निनोचे सावट आहे. यामुळे भारतात यावर्षी कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. अल निनो ही एक हवामानाची स्थिती आहे. यामध्ये पॅसिफिक महासागरातील पाण्याचे तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढते, ज्यामुळे जगभरातील वाऱ्याची दिशा आणि हवामान चक्र बिघडते, भारतासारख्या देशात एल निनोमुळे मान्सून कमजोर होऊन अनेकदा दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते. </p>]]></content:encoded></item><item><title>Ratnagiri News : उष्‍म्‍यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जि. प. शाळा शुक्रवारपासून सकाळी भरणार</title><link>https://pudhari.news/maharashtra/kokan/ratnagiri/ratnagiri-news-zp-schools-to-conduct-morning-classes-from-friday-amid-rising-heat-rg84</link><comments>https://pudhari.news/maharashtra/kokan/ratnagiri/ratnagiri-news-zp-schools-to-conduct-morning-classes-from-friday-amid-rising-heat-rg84#comments</comments><guid isPermaLink="false">3736bcef-abee-496e-88f9-603d9a202657</guid><pubDate>Thu, 18 Jun 2026 14:50:06 +0000</pubDate><atom:updated>2026-06-18T14:50:06.104Z</atom:updated><atom:author><atom:name>पुढारी वृत्तसेवा</atom:name><atom:uri>/api/author/1960322</atom:uri></atom:author><description></description><media:keywords>ratnagiri news,zp school</media:keywords><media:content height="675" url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/9grqubxr/ratnagiri-zp-school-news-1.jpg" width="1200"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/9grqubxr/ratnagiri-zp-school-news-1.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>रत्नागिरी</category><content:encoded><![CDATA[ <p><strong>रत्‍नागिरी :</strong> जिल्‍ह्यात पावसाने दडी मारल्‍यामुळे मोठ्या प्रमाणात उष्मा वाढला आहे. वाढत्‍या तापमानाने नागरिकांसह विद्यार्थी हैराण झाले आहेत. त्‍यामुळे जिल्‍हा परिषदेच्‍या शाळा १९ जूनपासून सकाळी भरवण्याचा निर्णय स्‍थायी समितीच्‍या बैठकीत घेण्यात आला आहे. </p><p>पावसाचे आगमन झाल्‍यास पुन्‍हा पूर्वीच्‍या वेळेनुसार शाळा भरतील, असा ठराव घेण्यात आला असल्‍याची माहिती जि.प. अध्यक्षा अस्‍मिता केंद्रे यांनी दिली. पावसाने विश्रांती घेतल्‍यामुळे जिल्‍ह्यात उन्‍हाळ्यासारखे तापमान झाले असून उष्‍म्‍यामुळे मुलांना त्रास वाढत आहे. </p><p>शाळा सकाळच्‍या वेळेत घ्याव्‍यात, अशी मागणी विविध संघटनांच्‍या वतीने करण्यात आली होती. यासंदर्भात चर्चा करून जिल्‍हा परिषद शाळा सकाळी घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसे आदेश जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांना पाठवण्यात येणार आहेत.</p>]]></content:encoded></item><item><title>Shiv Sena Ubt Protest | शिवसेना ठाकरे पक्षाचे भांडुपमध्ये निषेध आंदोलन; खा. संजय दिना पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी </title><link>https://pudhari.news/maharashtra/mumbai/mumbai-shiv-sena-ubt-protest-bhandup-sloganeering-against-mp-sanjay-dina-patil-as80</link><comments>https://pudhari.news/maharashtra/mumbai/mumbai-shiv-sena-ubt-protest-bhandup-sloganeering-against-mp-sanjay-dina-patil-as80#comments</comments><guid isPermaLink="false">13de800b-1bbf-4c3e-9407-b9f58d4ea7e8</guid><pubDate>Thu, 18 Jun 2026 14:37:32 +0000</pubDate><atom:updated>2026-06-18T14:37:32.497Z</atom:updated><atom:author><atom:name>पुढारी वृत्तसेवा</atom:name><atom:uri>/api/author/1960322</atom:uri></atom:author><description></description><media:keywords>Mumbai news,Leader of Shiv Sena Uddhav Thackeray faction,Balasaheb&apos;s Shiv Sena group</media:keywords><media:content height="675" url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/wzys27a2/14.jpg" width="1200"><media:title type="html"></media:title><media:description type="html"><![CDATA[ Bhandup Sanjay Dina Patil Sloganeering]]></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/wzys27a2/14.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>मुंबई</category><content:encoded><![CDATA[ <p>Bhandup Sanjay Dina Patil Sloganeering</p><p><strong>भांडुप :</strong> शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अलीकडील राजकीय घडामोडींमुळे मुंबईतील भांडुप परिसरात  गुरूवारी  (दि.१८)  पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले. पक्षातील सहा खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात हे आंदोलन करण्यात आले.</p><p>भांडुप रेल्वे स्थानकाजवळ, खासदार संजय दिना पाटील यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी काळे झेंडे फडकावत निषेध व्यक्त केला. तसेच खासदारांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन करून त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.</p><aside><a href="https://pudhari.news/maharashtra/mumbai/shiv-sena-thackeray-faction-show-cause-notice-absent-parliamentary-meeting-mps-mk96">Shiv Sena-UBT crisis: ठाकरे सेना बैठकीला अनुपस्थित खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावणार </a></aside><p>या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्षनिष्ठा आणि नेतृत्वावरील विश्वास व्यक्त करत पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या नेत्यांबाबत नाराजी व्यक्त केली. आंदोलनात मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष शिवसैनिक सहभागी झाले होते.</p><p>यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार सुनील राऊत यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्यावर टीका केली. पक्षाने त्यांना विविध निवडणुकांमध्ये साथ दिली असून कार्यकर्त्यांनी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संजय पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत भविष्यात मतदार त्यांना योग्य उत्तर देतील, असा दावा त्यांनी केला.</p><p>राजकीय घडामोडींमुळे शिवसेना ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून आगामी काळात या घडामोडींचे पडसाद स्थानिक राजकारणातही उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</p><figure class="op-interactive"><iframe allowfullscreen="allowfullscreen" frameborder="0" src="https://www.youtube.com/embed/_vEA2pskPZ8"></iframe></figure>]]></content:encoded></item><item><title>Eating Ice Cream At night : रात्री आईस्क्रीम खाणे योग्य की अयोग्य?   </title><link>https://pudhari.news/ampstories/web-stories/is-it-safe-to-eat-ice-cream-at-night-nl76</link><comments>https://pudhari.news/ampstories/web-stories/is-it-safe-to-eat-ice-cream-at-night-nl76#comments</comments><guid isPermaLink="false">91521cf0-0bbb-40ff-8343-6c5c5f17777b</guid><pubDate>Thu, 18 Jun 2026 14:35:42 +0000</pubDate><atom:updated>2026-06-18T14:35:42.303Z</atom:updated><atom:author><atom:name>पुढारी वृत्तसेवा</atom:name><atom:uri>/api/author/1960322</atom:uri></atom:author><description><![CDATA[ रात्री आईस्क्रीम खाणे योग्य की अयोग्य? ]]></description><media:keywords>health news,eating ice cream</media:keywords><media:content height="1351" url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/bstoxps8/web-story-1.jpg" width="736"><media:title type="html"><![CDATA[ Eating Ice Cream At night]]></media:title><media:description type="html"><![CDATA[ man eating ice cream at night ayurveda health tips]]></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/bstoxps8/web-story-1.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Web Stories</category><content:encoded><![CDATA[ <figure><img alt="person enjoying sweet ice cream in summer season" src="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/m9q7i3xf/web-story-2.jpg" /><figcaption>Eating Ice Cream At night</figcaption></figure><p><strong>जेवणानंतर गोड म्हणून आईस्क्रीम खाणे अनेकांना आवडते; पण आयुर्वेदानुसार हे कितपत योग्य आहे?</strong></p><figure><img alt="ayurveda body prakriti vata pitta kapha diet chart concept" src="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/njb2snw9/web-story-3.jpg" /><figcaption>Eating Ice Cream At night</figcaption></figure><p><strong>आयुर्वेद नेहमी ऋतू, वेळ आणि शरीराच्या प्रकृतीनुसार (वात-पित्त-कफ) अन्नपदार्थ खाण्याचा सल्ला देतो.</strong></p><figure><img alt="cold and heavy milk ice cream scoop in a bowl" src="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/w2ql3lw3/web-story-4.jpg" /></figure><p><strong>आयुर्वेदानुसार आईस्क्रीम हे गुणधर्माने अतिशय थंड (शीत), पचायला जड आणि कफ वाढवणारे मानले जाते.</strong></p><figure><img alt="stomach digestive fire jatharagni ayurveda health concept" src="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/d6j3wrwq/web-story-5.jpg" /><figcaption>Eating Ice Cream At night</figcaption></figure><p><strong>थंड आईस्क्रीम खाल्ल्याने अन्नाचे पचन करणारा शरीरातील 'जठराग्नी' मंदावतो. यामुळेपचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.</strong></p><figure><img alt="sunset nature view representing natural rise of kapha dosha" src="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/qxdale6g/web-story-6.jpg" /></figure><p><strong>रात्री शरीरात नैसर्गिकरित्या 'कफ' दोष वाढू लागतो. अशा वेळी आईस्क्रीम खाल्ल्याने कफ अधिक वाढू शकतो.</strong></p><figure><img alt="person suffering from cold cough and sore throat illness" src="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/cnmtp3z9/web-story-7.jpg" /><figcaption>Eating Ice Cream At night</figcaption></figure><p><strong>रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने सर्दी, खोकला, घसा खराब होणे किंवा सायनसचा त्रास होण्याचा धोका वाढतो.</strong></p><figure><img alt="slow metabolism weight gain and body fat concept" src="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/wnjzi2s4/web-story-८.jpg" /></figure><p><strong>रात्रीच्या वेळी मेटाबॉलिझम (Metabolism) मंद असते. यामुळे रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने वजन किंवा चरबी वाढू शकते.</strong></p><figure><img alt="eating ice cream in afternoon daytime sunny weather" src="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/kr1cnfe6/web-story-9.jpg" /><figcaption>Eating Ice Cream At night</figcaption></figure><p><strong>आईस्क्रीम खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे 'दुपार'. या काळात शरीरातील जठराग्नी प्रबळ असतो, ज्यामुळे पचन व्यवस्थित होते.</strong> </p><figure><img alt="drinking cold water after eating dessert risk during winter monsoon" src="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/j192vzy9/web-story-10.jpg" /></figure><p><strong>आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेचच अतिशय थंड पाणी पिणे टाळावे. तसेच हिवाळ्यात आणि पावसाळ्यात रात्री आईस्क्रीम खाणे टाळावे.</strong></p><a class="cta-anchor" href="https://pudhari.news/ampstories/web-stories/strength-training-benefits-for-longevity-at-home-workout-tips-nl76" target="_blank" rel=""><span class="cta-text">येथे क्‍लिक करा. </span></a>]]></content:encoded></item><item><title>IND vs ENG Lords Test : भारताविरुद्धच्या ऐतिहासिक लॉर्ड्स कसोटीसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा</title><link>https://pudhari.news/sports/ind-vs-eng-lord-s-test-england-announce-squad-for-historic-test-against-india-rg84</link><comments>https://pudhari.news/sports/ind-vs-eng-lord-s-test-england-announce-squad-for-historic-test-against-india-rg84#comments</comments><guid isPermaLink="false">7e45e6eb-f23b-4067-a33c-a24fb123aa4d</guid><pubDate>Thu, 18 Jun 2026 14:26:48 +0000</pubDate><atom:updated>2026-06-18T14:26:48.889Z</atom:updated><atom:author><atom:name>रणजित गायकवाड</atom:name><atom:uri>/api/author/1958713</atom:uri></atom:author><description></description><media:keywords>IND vs ENG Test,ind vs eng test match</media:keywords><media:content height="675" url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/wu4gsmsl/England-name-squad-for-historic-Lords-womens-Test.jpg" width="1200"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/wu4gsmsl/England-name-squad-for-historic-Lords-womens-Test.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>स्पोर्ट्स</category><content:encoded><![CDATA[ <p><strong>लंडन:</strong> महिला टी-२० विश्वचषक २०२६ च्या थरारानंतर भारत आणि इंग्लंड महिला संघांमधील क्रिकेटचा रणसंग्राम आता कसोटी क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळणार आहे. आगामी १० जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात इंग्लंडच्या संघाची धुरा अष्टपैलू खेळाडू नॅट सायव्हर-ब्रंट हिच्याकडे सोपवण्यात आली आहे.</p><p>सध्या भारतीय महिला संघ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत व्यस्त असून या स्पर्धेचा अंतिम सामना ५ जुलै रोजी खेळवला जाणार आहे. या विश्वचषकाची सुरुवात होण्यापूर्वी भारताने इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली होती. आता विश्वचषक संपल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत, म्हणजेच १० जुलैपासून उभय संघांमध्ये हा ऐतिहासिक कसोटी सामना रंगणार आहे.</p><h3>लॉर्ड्सवर रचला जाणार इतिहास; हिथर नाईटसह नवोदितांना संधी</h3><p>क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर आजवर अनेक ऐतिहासिक आणि अटीतटीचे सामने खेळले गेले आहेत. मात्र, लॉर्ड्सच्या प्रदीर्घ इतिहासात पहिल्यांदाच महिला कसोटी सामन्याचे आयोजन केले जात असल्याने या लढतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या ऐतिहासिक सामन्यासाठी इंग्लंडने अत्यंत समतोल संघाची निवड केली आहे. संघात १४ कसोटी सामन्यांचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या माजी कर्णधार हिथर नाईट हिचा समावेश करण्यात आला आहे. तिच्या अनुभवाचा इंग्लंडला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.</p><p>विशेष म्हणजे, बोर्डाने या महत्त्वाच्या सामन्यासाठी युवा रक्तालाही वाव दिला असून ॲलिस कॅप्सी, टिली कॉर्टिन-कोलमन आणि मॅडी विलियर्स या तीन युवा खेळाडूंना पहिल्यांदाच इंग्लंडच्या कसोटी संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे अंतिम अकरामध्ये स्थान मिळवणाऱ्या खेळाडूंसाठी हा सामना वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर अत्यंत संस्मरणीय ठरणार आहे. याशिवाय एमी जोन्स आणि सोफी एक्लेस्टोन या अनुभवी खेळाडू देखील संघाचा मुख्य कणा असतील. दुसरीकडे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या ऐतिहासिक सामन्यासाठी आधीच भारतीय संघाची घोषणा केली असून भारताचे नेतृत्व हरमनप्रीत कौर हिच्याकडे असणार आहे.</p><h3>उभय संघांमधील आजवरचा इतिहास</h3><p>महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला सामना १९८६ मध्ये खेळवला गेला होता. तेव्हापासून आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण १५ कसोटी सामने खेळले गेले आहेत. या आकडेवारीवर नजर टाकल्यास भारतीय संघाचे पारडे जड असल्याचे दिसते. भारताने या १५ पैकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे, तर इंग्लंडला केवळ एका सामन्यात यश आले आहे. उर्वरित ११ सामने अनिर्णित (ड्रॉ) सुटले आहेत. या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये शेवटची कसोटी लढत २०२३ च्या अखेरीस खेळवली गेली होती.</p><h3><strong>कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा १५ सदस्यीय संघ</strong></h3><p>नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), टॅमी ब्यूमोंट, लॉरेन बेल, माया बाउचर, ॲलिस कॅप्सी, टिली कॉर्टिन-कोलमन, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फाइलर, एमी जोन्स, हिथर नाईट, एमा लॅम्ब, ग्रेस पॉट्स, एली थ्रेलकेल्ड, मॅडी विलियर्स, इझी वाँग.</p>]]></content:encoded></item><item><title>Kolhapur Rain Prayers | पावसासाठी पिंपळवाडी ग्रामस्थांचे देवदेवतांना साकडे; बैलगाडी मिरवणुकीसह जलाभिषेक</title><link>https://pudhari.news/maharashtra/kolhapur/radhanagari-pimpalwadi-villagers-pray-for-rain-bullock-cart-procession-kolhapur-as80</link><comments>https://pudhari.news/maharashtra/kolhapur/radhanagari-pimpalwadi-villagers-pray-for-rain-bullock-cart-procession-kolhapur-as80#comments</comments><guid isPermaLink="false">9b9842d6-78ea-40e2-9c1c-e22e00adfe1d</guid><pubDate>Thu, 18 Jun 2026 14:23:15 +0000</pubDate><atom:updated>2026-06-18T14:23:15.472Z</atom:updated><atom:author><atom:name>पुढारी वृत्तसेवा</atom:name><atom:uri>/api/author/1960322</atom:uri></atom:author><description></description><media:keywords>kolhapur news,Kolhapur News Update</media:keywords><media:content height="675" url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/znxlouwf/13.jpg" width="1200"><media:title type="html"><![CDATA[ ग्रामस्थांनी बैलगाडी मिरवणूक काढत पवित्र गंगबावीतील पाणी आणून विविध देवस्थानांमध्ये जलाभिषेक करून वरुणराजाला साद घातली.]]></media:title><media:description type="html"><![CDATA[ Radhanagari Pimpalwadi Jalabhishek Ritual For Rain]]></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/znxlouwf/13.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>कोल्हापूर</category><content:encoded><![CDATA[ <p>Radhanagari Pimpalwadi Jalabhishek Ritual For Rain</p><p><strong>कौलव :</strong> जून महिन्याचा अर्धा कालावधी उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. शेतीसह जनजीवनावर पावसाचे संकट गडद होत असताना राधानगरी तालुक्यातील पिंपळवाडी येथील ग्रामस्थांनी पारंपरिक श्रद्धा आणि संस्कृती जपत गावातील तसेच पंचक्रोशीतील देवदेवतांना साकडे घातले. ग्रामस्थांनी बैलगाडी मिरवणूक काढत पवित्र गंगबावीतील पाणी आणून विविध देवस्थानांमध्ये जलाभिषेक करून वरुणराजाला साद घातली.</p><p>डोंगरमाथ्यावर वसलेल्या पिंपळवाडी गावाचे संपूर्ण जनजीवन पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. शेती हा येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय असून बहुतांश शेतकरी भातशेती करतात. यंदा मान्सून वेळेत दाखल होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सुमारे महिनाभरापूर्वी भाताच्या धूळवाफ पेरण्या केल्या होत्या. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने अनेक ठिकाणी उगवलेले भाताचे अंकुर करपून गेले आहेत. परिणामी शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.</p><aside><a href="https://pudhari.news/maharashtra/kolhapur/shirol-alas-pedha-disposed-krishna-river-before-fda-raid-kolhapur-as80">Kolhapur FDA Raid | आलासात FDA छाप्यापूर्वीच पेढ्यांची कृष्णा नदीत विल्हेवाट?; माहिती फुटल्याच्या चर्चेला उधाण</a></aside><p>पावसाअभावी केवळ शेतीच नव्हे तर ग्रामीण अर्थकारणालाही फटका बसत आहे. ऊसतोडणी, मजुरी, हमाली आणि शेतीपूरक व्यवसायांवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पाण्याअभावी जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला असून हिरवा चारा आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे कठीण झाले आहे.</p><p>या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने पावसासाठी प्रार्थना करण्याचा निर्णय घेतला. बैलगाडीच्या मिरवणुकीतून गंगबावीचे पवित्र पाणी आणण्यात आले. त्यानंतर ग्रामदैवत इरदेव, भैरवनाथ, श्री स्वामी समर्थ आणि चक्रेश्वर देवस्थानांमध्ये विधिवत जलाभिषेक करण्यात आला. यावेळी गावातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.</p><aside><a href="https://pudhari.news/maharashtra/kolhapur/demonetization-25-crore-dust-gathering-district-bank-10-years-mk94">Kolhapur news | नोटाबंदीनंतर २५ कोटींच्या नोटा 10 वर्षे जिल्हा बँकेत धूळ खात</a></aside><p>ग्रामीण भागात आजही अनेक ठिकाणी पावसासाठी देवदेवतांना साकडे घालण्याची परंपरा जपली जाते. पिंपळवाडीतील ग्रामस्थांनीही याच श्रद्धेतून जलाभिषेक करून चांगल्या पावसासाठी प्रार्थना केली. शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य ग्रामस्थांचे डोळे आता आकाशाकडे लागले असून लवकरात लवकर पाऊस पडून शेतीला जीवदान मिळावे, अशीच सर्वांची अपेक्षा आहे.</p><figure class="op-interactive"><iframe allowfullscreen="allowfullscreen" frameborder="0" src="https://www.youtube.com/embed/_vEA2pskPZ8"></iframe></figure>]]></content:encoded></item><item><title>Bhandara News | धावत्या एक्सप्रेसमध्ये युवकाने गळफासाने संपवले जीवन, मृतदेह खिडकीबाहेर लोंबकळत!   </title><link>https://pudhari.news/maharashtra/vidarbha/bhandara/bhandara-news-youth-ends-life-by-hanging-in-running-express-train-body-found-hanging-outside-window-ng81</link><comments>https://pudhari.news/maharashtra/vidarbha/bhandara/bhandara-news-youth-ends-life-by-hanging-in-running-express-train-body-found-hanging-outside-window-ng81#comments</comments><guid isPermaLink="false">7e914a4a-a630-4ca4-8c24-ce3d437347b4</guid><pubDate>Thu, 18 Jun 2026 14:19:21 +0000</pubDate><atom:updated>2026-06-18T14:19:21.300Z</atom:updated><atom:author><atom:name>पुढारी वृत्तसेवा</atom:name><atom:uri>/api/author/1960322</atom:uri></atom:author><description></description><media:keywords>Bhandara,Express train,Tumsar</media:keywords><media:content height="675" url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/qhymnjpz/pudhari-photo-57.jpg" width="1200"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/qhymnjpz/pudhari-photo-57.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>भंडारा</category><content:encoded><![CDATA[ <p><strong>भंडारा:</strong> तुमसर रोड रेल्वे स्थानकावर आज, १८ जून रोजी पहाटेच्या सुमारास एका अज्ञात युवकाने धावत्या रेल्वेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना इतवारी-टाटानगर एक्सप्रेसमध्ये घडली असून, युवकाचा मृतदेह खिडकीच्या बाहेरील बाजूस लोंबकळत असल्याचे आढळून आले. </p><p> मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास इतवारी-टाटानगर एक्सप्रेस तुमसर रोड रेल्वे स्थानकावर थांबली होती. याच दरम्यान एका डब्याच्या खिडकीला अज्ञात युवकाचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत असल्याचे काही प्रवाशांच्या निदर्शनास आले. हे &nbsp;दृश्य पाहताच प्रवाशांनी आरडाओरड करून रेल्वे प्रशासनाला सतर्क केले. धक्कादायक बाब म्हणजे, मृतदेह खिडकीबाहेर लोंबकळत असल्याने रेल्वेच्या चाकाखाली येऊन त्या युवकाचे दोन्ही पाय कापले गेल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.</p><p>पोलिसांकडून शोध सुरू<br>मृताची ओळख अद्याप अस्पष्ट घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस दल आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला. सदर युवकाची ओळख अद्याप पटलेली नसून, तो नेमका कोण होता आणि त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास पोलिस करत आहेत. युवकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.</p>]]></content:encoded></item><item><title>Kolhapur FDA Raid | आलासात FDA छाप्यापूर्वीच पेढ्यांची कृष्णा नदीत विल्हेवाट?; माहिती फुटल्याच्या चर्चेला उधाण</title><link>https://pudhari.news/maharashtra/kolhapur/shirol-alas-pedha-disposed-krishna-river-before-fda-raid-kolhapur-as80</link><comments>https://pudhari.news/maharashtra/kolhapur/shirol-alas-pedha-disposed-krishna-river-before-fda-raid-kolhapur-as80#comments</comments><guid isPermaLink="false">88ddd676-b87f-46fb-9096-44718abfce8c</guid><pubDate>Thu, 18 Jun 2026 14:12:29 +0000</pubDate><atom:updated>2026-06-18T14:12:29.388Z</atom:updated><atom:author><atom:name>पुढारी वृत्तसेवा</atom:name><atom:uri>/api/author/1960322</atom:uri></atom:author><description></description><media:keywords>kolhapur news,Kolhapur News Update</media:keywords><media:content height="675" url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/te4eipsd/12.jpg" width="1200"><media:title type="html"><![CDATA[ Pedha Disposed In Krishna River]]></media:title><media:description type="html"><![CDATA[ Pedha Disposed In Krishna River]]></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/te4eipsd/12.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>कोल्हापूर</category><content:encoded><![CDATA[ <p>Shirol Alas Fda Raid Pedha Disposed In Krishna River</p><p><strong>कुरुंदवाड :</strong> आलास (ता. शिरोळ) येथील खवा व पेढा निर्मिती केंद्रावर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने गुरुवारी (दि.१८)  सकाळी छापेमारी करून नमुने घेतले. मात्र, या कारवाईपूर्वीच पहाटे मोठ्या प्रमाणावर पेढ्यांची विल्हेवाट लावण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगली असून छाप्याची माहिती संबंधितांपर्यंत आधीच पोहोचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.</p><p>स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे काही प्रमाणात पेढे कृष्णा नदी परिसरात टाकण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर काही तासांतच अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई झाल्याने छाप्याची गोपनीय माहिती आधीच फुटली होती का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.</p><aside><a href="https://pudhari.news/maharashtra/kolhapur/shahuwadi-kadvi-kasari-dam-water-storage-drop-re-sowing-threat-kolhapur-as80">Kolhapur Water Crisis | ‘शाहूवाडी’त कोरड्या नद्या अन् तळ गाठलेल्या  धरणांमुळे बळीराजा चिंतेत! दुबार पेरणीचे सावट </a></aside><p>दरम्यान, छापेमारीनंतर नमुने घेऊन परतत असताना अन्न व औषध प्रशासन विभागाचे वाहन आलास-शहापूरे मार्गावरील एका शेताजवळ काही काळ थांबले होते, अशी माहिती समोर आली आहे. यावेळी कारवाई झालेल्या संबंधित व्यक्तींशी अधिकाऱ्यांची चर्चा झाल्याचेही स्थानिकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे संपूर्ण कारवाईबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.</p><p>या संदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकारी दीपा फावडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.</p><p>आलास परिसरात बाहेरून आणल्या जाणाऱ्या खव्यामध्ये विविध पदार्थांची भेसळ करून पेढे तयार केले जात असल्याची चर्चा काही काळापासून सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर झालेल्या कारवाईनंतर संबंधितांनी तयार मालाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला असावा, अशी शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.</p><aside><a href="https://pudhari.news/maharashtra/kolhapur/demonetization-25-crore-dust-gathering-district-bank-10-years-mk94">Kolhapur news | नोटाबंदीनंतर २५ कोटींच्या नोटा 10 वर्षे जिल्हा बँकेत धूळ खात</a></aside><p>नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अशा प्रकरणांमध्ये दोषींवर कठोर कारवाई व्हावी, तसेच छाप्याची माहिती संबंधितांपर्यंत पोहोचली का, याची स्वतंत्र चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. याशिवाय कृष्णा नदी परिसरात अन्नपदार्थ किंवा अन्य साहित्य टाकून प्रदूषण केले असल्यास त्याचीही चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.</p><figure class="op-interactive"><iframe allowfullscreen="allowfullscreen" frameborder="0" src="https://www.youtube.com/embed/_vEA2pskPZ8"></iframe></figure>]]></content:encoded></item><item><title>Tuljabhavani temple | तुळजाभवानी देवीच्‍या दर्शन व्‍यवस्‍थेत नवीन बदल गुरुवारपासून लागू!</title><link>https://pudhari.news/maharashtra/marathwada/dharashiv/tuljabhavani-temple-tuljapur-new-darshan-system-rules-implemented-from-thursday-ng81</link><comments>https://pudhari.news/maharashtra/marathwada/dharashiv/tuljabhavani-temple-tuljapur-new-darshan-system-rules-implemented-from-thursday-ng81#comments</comments><guid isPermaLink="false">ade9418e-de18-4449-8e03-438b25fef66a</guid><pubDate>Thu, 18 Jun 2026 14:08:55 +0000</pubDate><atom:updated>2026-06-18T14:08:55.264Z</atom:updated><atom:author><atom:name>पुढारी वृत्तसेवा</atom:name><atom:uri>/api/author/1960322</atom:uri></atom:author><description></description><media:keywords>Tuljabhavani Devi,Tuljabhavani</media:keywords><media:content height="675" url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/td2l2cz1/pudhari-photo-56.jpg" width="1200"><media:title type="html"><![CDATA[ Tuljabhavani temple ]]></media:title><media:description type="html"><![CDATA[ Tuljabhavani temple ]]></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/td2l2cz1/pudhari-photo-56.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>धाराशिव</category><content:encoded><![CDATA[ <p> <strong>तुळजाभवानी</strong> देवींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी आणि दर्शन व्यवस्थेतील सुसूत्रता लक्षात घेऊन मंदिर संस्थानने दर्शन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. ही नवीन व्यवस्था गुरुवार (दि. १८ जून) पासून लागू करण्यात आली असून, सर्व प्रकारच्या भाविकांना एकाच ठिकाणाहून देवीचे दर्शन मिळेल, अशी रचना करण्यात आली आहे. </p><p>नवीन व्यवस्थेनुसार ५०० रुपये देणगी दर्शन पासधारक आणि रेफरल देणगी दर्शन पासधारकांना राजे शहाजी महाद्वारातून प्रवेश देऊन टोळभैरव पायऱ्यांमार्गे दर्शन मंडपात नेले जाईल. २०० रुपये देणगी दर्शन पासधारकांना बिडकर पायऱ्यांमार्गे पहिल्या मजल्यावरील इमर्जन्सी गेटमधून प्रवेश दिला जाईल. धर्मदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चौथ्या मजल्यावरून रांगेत सामावून घेतले जाईल.</p><p>मुखदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची व्यवस्था तळमजल्यावर करण्यात आली असून, सिंहासन पूजा आणि अभिषेक पूजेची व्यवस्था पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. या बदलामुळे ५०० रुपये, २०० रुपये देणगी दर्शन तसेच धर्मदर्शन रांगेतील भाविकांना सिंहाच्या गाभाऱ्यातून समान अंतरावरून देवीचे दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे देणगी आणि सामान्य रांगांतील दर्शनस्थळातील फरक दूर होऊन सर्वांना समान पद्धतीने दर्शनाचा लाभ मिळणार आहे.</p><p>यापूर्वी देणगी दर्शन रांगेमुळे धर्मदर्शनातील भाविकांना अडथळे निर्माण होत असल्याच्या तक्रारी होत्या. तसेच सिंहासन व अभिषेक पूजा सुरू असताना देणगी दर्शन तात्पुरते थांबवावे लागत होते. नव्या व्यवस्थेमुळे अशा अडचणी कमी होऊन देणगी दर्शन अधिक सातत्याने सुरू ठेवणे शक्य होणार असल्याचे संस्थानने स्पष्ट केले आहे.&nbsp;मंदिर प्रशासनाने सर्व भाविकांनी नव्या दर्शन व्यवस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.</p>]]></content:encoded></item><item><title>Nanded Crime | आमदापूर खुनाचा उलगडा: बेपत्ता व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पत्नीसह दोघांना अटक</title><link>https://pudhari.news/maharashtra/marathwada/nanded/nanded-amdapur-murder-case-solved-markhel-police-arrest-wife-and-accomplice-as80</link><comments>https://pudhari.news/maharashtra/marathwada/nanded/nanded-amdapur-murder-case-solved-markhel-police-arrest-wife-and-accomplice-as80#comments</comments><guid isPermaLink="false">864452e6-8759-47cc-aa14-5fefe1fbc425</guid><pubDate>Thu, 18 Jun 2026 13:59:46 +0000</pubDate><atom:updated>2026-06-18T13:59:46.585Z</atom:updated><atom:author><atom:name>पुढारी वृत्तसेवा</atom:name><atom:uri>/api/author/1960322</atom:uri></atom:author><description></description><media:keywords>nanded crime,nanded crime news</media:keywords><media:content height="675" url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/fmljvlpi/11.jpg" width="1200"><media:title type="html"><![CDATA[ मृताच्या पत्नीसह दोन आरोपींना अटक करण्यात आली ]]></media:title><media:description type="html"><![CDATA[ Missing Person Dead Amdapur Nanded]]></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/pudharinews/2026-06-18/fmljvlpi/11.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>नांदेड</category><content:encoded><![CDATA[ <p>Missing Person Dead Amdapur Nanded</p><p><strong>हणेगाव :</strong> मरखेल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेपत्ता व्यक्तीच्या खुनाचा यशस्वी उलगडा करण्यात मरखेल पोलिसांना मोठे यश आले आहे. या प्रकरणी मृताच्या पत्नीसह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.</p><p>पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकिशन गंगाधर गोलेवार (वय ५५ रा. आमदापूर) हे २५ एप्रिल २०२६ पासून बेपत्ता होते. याबाबत त्यांच्या पत्नीने १७ मे २०२६ रोजी मरखेल पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला हे प्रकरण केवळ बेपत्ता व्यक्तीचे असल्याचे दिसत असले तरी तपासादरम्यान पोलिसांना अनेक संशयास्पद बाबी आढळून आल्या. तांत्रिक विश्लेषण, कॉल डिटेल, गुप्त माहिती आणि विविध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.</p><aside><a href="https://pudhari.news/maharashtra/marathwada/nanded/illegal-teak-timber-transport-exposed-in-patoda-nanded-assets-confiscated-mk94">Nanded Crime | पाटोदा परिसरात अवैध सागवान वाहतूक उघड; ६० हजारांचा मुद्देमाल जप्त</a></aside><p>सखोल चौकशीदरम्यान दैवशाला रामकिशन गोलेवार (वय ४०) व सुभाष व्यंकन्ना यत्तरवाड (वय ४५ ) यांच्यावर संशय बळावला. पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केल्यानंतर गुन्ह्याची कबुली मिळाल्याचे सांगण्यात आले. आरोपींच्या सांगण्यावरून मृतदेह पुरलेल्या ठिकाणाचा शोध घेण्यात आला. उत्खनन करून मृतदेह बाहेर काढण्यात आला तसेच गुन्ह्यात वापरलेला दगड, मृताचे कपडे व डीएनए नमुने जप्त करण्यात आले.</p><p>या प्रकरणी मरखेल पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.</p><figure class="op-interactive"><iframe allowfullscreen="allowfullscreen" frameborder="0" src="https://www.youtube.com/embed/_vEA2pskPZ8"></iframe></figure>]]></content:encoded></item></channel></rss>