जळगाव जिल्ह्यात अनलॉकचे नोटिफिकेशन जारी : अभिजीत राऊत
जळगाव; पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील निर्बंध शिथील करण्याचे निर्देश नोटिफिकेशनच्या माध्यमातून जारी केले आहेत. अनलॉकचे नोटिफिकेशन जारी केल्याने व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारने काल निर्बंध शिथील करण्याचे संकेत दिले होते. यानंतर सायंकाळी एका ‘जीआर’च्या माध्यमातून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली. यानंतर आज मंगळवारी (दि.३) रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जळगाव जिल्ह्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. यात खालील प्रमाणे नवीन नियम असणार आहेत.
- अभिनेते मिलिंद शिंदे ‘जयंती’ चित्रपटाच्या शुटींगदरम्यान थोडक्यात बचावले!
- चित्रपट समीक्षक राशिद इराणी यांचे निधन, मृतदेह तीन दिवस घरातच
- राज्यातील सर्व दुकानांना सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये रात्री आठ वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंतच दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. रविवारी सर्व दुकाने बंद राहणार आहेत. अर्थात, दुकानदारांना पाच दिवसांमध्ये वाढीव वेळेसह शनिवारी अर्धवेळ दुकाने उघडता येणार आहेत.
- राज्यातील सर्व उद्याने बगीचे आदींना उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- सर्व शासकीय आणि खासगी कार्यालये हे कर्मचार्यांच्या पूर्ण क्षमतेसह सुरू राहणार आहेत.
- कृषी, उद्योग, स्थापत्य आदी क्षेत्रांना आधीप्रमाणेच पूर्ण क्षमतेने काम करता येणार आहे.
- सलून, स्पा आदी दुकानांना ५० टक्के क्षमतेसह रात्री आठ वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- सिनेमागृहे (मल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन), नाट्यगृहे, थिअटर्स आदींना मात्र परवानगी देण्यात आलेली नाही.
- राज्यातील सर्व देवस्थांना सुध्दा उघडण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.
- शाळा व महाविद्यालयांबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड तसेच टेक्नीकल बोर्डचे नियम लागू राहतील.
- हॉटेल आणि उपहारगृहे हे सायंकाळी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहू शकतात.
- राजकीय, सामाजिक कार्यक्रम, अंत्यसंस्कार, जाहीर कार्यक्रम आदींसाठी आधीचेच निर्बंध कायम राहतील.
- सोर्ड मारजेन ( Sjoerd Marijne ) यांनी चित्रपट दाखवत महिला हॉकीचा बदलला इतिहास
- Online Interview : ऑनलाईन इंटरव्ह्यू देताय? हे मुद्दे लक्षात ठेवा!
जळगाव जिल्ह्यात काही प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आलेले असून, चेहऱ्यावर मास्क लावणे, सॅनिटाईजरचा वापर , सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि शासनाने दिलेल्या निर्गमित केलेले नियमांचे पालन करण्याचे गरजेचे आहे.
- जळगावात दोन तरुणांची गळफास घेवून आत्महत्या
- क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांचे अभिवादन
तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास ५०० रूपये दंड आकारण्यात यावी, अशी सूचना पोलीस विभाग आणि महापालिका यांना देण्यात आले आहे.
हेही वाचलंत का?