प्रेमास रंग यावे : गोष्ट दोन जणांची नवी मालिका लवकरच | पुढारी

प्रेमास रंग यावे : गोष्ट दोन जणांची नवी मालिका लवकरच

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे नेमकं कशावर प्रेम करतो? त्या व्यक्तीच्या रंग-रूपावर, श्रीमंतीवर, कि त्या व्यक्तीच्या चांगुलपणावर, त्याच्या सुंदर मनावर? सन मराठीवरील २० फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेली ‘प्रेमास रंग यावे ही मालिका नेमकी ह्याच प्रश्नाभोवती फिरते. ही गोष्ट आहे एका अत्यंत हुशार, सालस, सहृदयी अक्षराची आणि एका चांगल्या मनाच्या पण खुशालचेंडू, न्यूनगंडाने भरलेल्या आणि पारंपरिक अर्थाने देखणा नसलेल्या सुंदरची.

ही मालिका सुंदर दिसण्यापेक्षा चांगलं माणूस असणं कितीतरी पटीने जास्त महत्वाचं आहेत ह्याची जाणीव करून देते शिवाय मन चांगलं असेल तर मनासारखा जोडीदारही मिळतो हे पटवून देते. कारण म्हणतात ना, प्रेमासारखं दुसरं कुठलं सुख नाही. प्रेमाला कुठला रंग, कुठलं रूप नाही.

या मालिकेत मनमिळाऊ आणि सगळ्यांना आपलंसं करणाऱ्या ‘अक्षरा’ या मुख्य पात्राच्या भूमिकेत अभिनेत्री अमिता कुलकर्णी आहे. निर्मळ मनाच्या पण शून्य व्यवहारज्ञान असलेल्या सुंदरची भूमिका सादर करणार आहे- अभिनेता रोहित शिवलकर.

या सोबतच समीरा गुजर- जोशी, अभिजित चव्हाण, सारिका नवाथे, मोनिका दाभाडे, संजीव तांडेल,किरण डांगे, सचिन माने, गौरी कुलकर्णी, विद्या संत असे अनेक कलाकार मालिकेत दिसणार आहेत. या मालिकेची निर्मिती डॉ.अ मोल कोल्हे यांची जगदंब ही निर्मिती संस्था करत असून मालिकेचे दिग्दर्शन चंद्रकांत गायकवाड यांनी केले आहे.

Back to top button