परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढल्या; हायकोर्टाने याचिका फेटाळली
मुबई, पुढारी ऑनलाईन: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची याचिका हायकोर्टाने फेटाळल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाटल्या आहेत. त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे रद्द करावेत, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात केली होती.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणी वसुलीचा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला हाोता.
- तिरुपती देवस्थान ट्रस्ट सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती
- राजा राणीची गं जोडी : मोनाऐवजी ‘फँड्री’ फेम ‘ही’ अभिनेत्री झळकणार
आता तेही कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत.
त्यांच्याविरोधात महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या चौकशीविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. महाराष्ट्र सरकराने सुरू केलेल्या दोन प्रकरणातील तपासाविरोधात याचिका दाखल केली होती.
यामध्ये सेवेसंदर्भातल्या नियमांचं उल्लंघन आणि भ्रष्टाचाराचे आरोप अशा दोन प्रकरणांचा समावेश आहे.
ही याचिका ‘नॉन मेंटेनेबल’ असल्याचे नमूद करत न्यायालयानं ती फेटाळून लावली आहे.
- सीपीआय नेता कन्हैया कुमार करणार काँग्रेसमध्ये प्रवेश
- लियोनेल मेस्सी बाहेर पडल्यानंतर बार्सिलोनाचा पराभव
काय म्हटले होते याचिकेत
राज्यातल्या महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचे प्रकरण मी उघड केल्यामुळेच मला लक्ष्य करण्यासाठी हे आरोप ठेवले आहेत.
तसेच चौकशी सुरू केली आहे,’ असा दावा परमबीर सिंह यांनी या याचिकेमध्ये केला होता.
१ एप्रिल २०२० आणि २० एप्रिल २०२१ रोजी आपल्या चौकशीचे आदेश देण्यात आले.
मात्र, आपण पत्राद्वारे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचे आरोप केल्यानंतरच आपली चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: