परळी सुन्न, राज्याची मान खाली गेली; पंकजा मुंडे यांच्या ट्विटने खळबळ
बीड; पुढारी वृत्तसेवा : करुणा शर्मा- मुंडे प्रकरण आणि दोन दिवस घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी राज्यात खळबळ उडाली. या साऱ्या प्रकरणावर विरोधकही गप्प असताना पंकजा मुंडे यांनी कोणाचेही नाव न घेता, “परळी सुन्न आहे. मान खाली गेली आहे राज्याची” असे म्हणत ट्विट केले आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विटच्या माध्यमातून शासन, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या ट्विटने मोठी खळबळ उडाली आहे.
- गोदावरी नदीला महापूर, सर्व धरणे तुडुंब
- Ganesh Mandal : राज्यात गणेश मंडळांना घरगुती दराने मिळणार वीज
करूणा शर्मा यांनी परळी येथे पत्रकार परिषद घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांचे पुरावे देणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, त्या परळीत पत्रकार परिषद घेण्यासाठी आल्या, मात्र पत्रकार परिषद घेण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यांच्या गाडीत पिस्तूल सापडले. या दरम्यान गाडीत काहीतरी ठेवले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर ॲट्रॉसिटी, चाकूहल्ला हे गुन्हेही दाखल झाले.
- वाघाची ‘मावशी’ ठरली बिबट्यावर भारी! व्हिडिओ व्हायरल
- सागर सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हा; राजू शेट्टींच्या कार्यकर्त्याला घरात घुसून मारहाण
या साऱ्या प्रकरणावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ट्विट केले आहे. त्यांच्या ट्विटने मोठी खळबळ उडाली आहे.
- सोन्या-चांदीचे अलंकार वाढवणार बाप्पाचा थाट
- करुणा शर्मा-मुंडे प्रकरण : करुणा शर्मा-मुंडे प्रकरणाने पुन्हा गदारोळ!
काय आहे ट्वीट?
“अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही. पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये, wrong presidents hould not be set! ही काळाची गरज आहे, परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची !!”
- घरगुती गॅस ग्राहकांच्या खिशाला कात्री!
- म. ए. समितीला बेळगाव महापालिकेची सत्ता का गमवावी लागली?
- अखेर किम शर्मा- लिएंडर पेस रिलेशनशिपमध्ये
- सुख म्हणजे नक्की काय असतं : शालिनी विषयी या गोष्टी माहिती आहेत का?
अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो.शासन,प्रशासन,न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये,wrong president should not be set!ही काळाची गरज आहे,परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची !!
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 7, 2021