Sukh Mhanje Nakki Kay Asta : जयदीप-गौरीच्या लग्नाची घाई | पुढारी

Sukh Mhanje Nakki Kay Asta : जयदीप-गौरीच्या लग्नाची घाई

मुंबई; पुढारी ऑनलाईन: छोट्या पडद्यावरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ( Sukh Mhanje Nakki Kay Asta ) या मालिकेत गौरी-जयदीपच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सुख येणार आहे. दोघांनी एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर आता ते पुन्हा विवाहबंधनात अडकणार आहेत.

Sukh Mhanje Nakki Kay Asta मालिकेत शिर्केपाटील कुटुंबात प्रत्येत समारंभ अगदी थाटामाटात पार पडतो. त्यामुळे जयदीप-गौरीचं लग्नही अगदी शाही थाटात पार पडणार आहे. प्री वेडिंग फोटोशूटपासून, मेहंदी, संगीत, हळद आणि वरात असा सगळा थाट लग्नात पाहायला मिळेल.

नऊवारी साडीत गौरीचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे. तर जयदीपही धोतर, फेटा अशा पारंपरिक लूकमध्ये दिसणार आहे. माई-दादा गौरीला मुलीप्रमाणे मानतात. त्यामुळे लग्नात गौरीच्या आई-वडिलांची जबाबदारी माई-दादांनीच पार पाडली आहे.

या सगळ्यात विशेष लक्ष वेधून घेतंय ते गौरीचं मंगळसूत्र. जयदीपच्या प्रेमाची निशाणी असलेलं मोरपीस गौरीने लहानपणापासून जपून ठेवलं होतं. हीच निशाणी तिच्या मंगळसूत्रामध्येही जपली जाणार आहे. जयदीप गौरीच्या लग्नाचा थाट पहाण्यासाठी पाहायला विसरु नका सुख म्हणजे नक्की काय असतं रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

हेही वाचलंत का? 

Back to top button