वेळेत पुरस्कार देत जा, सुलोचना चव्हाण यांचे पुत्र विजय यांची खंत
पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी व ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण (Aamir Khan) यांचे वार्धक्याने निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईतील गिरगाव फणसवाडीमधील लीला तारा इमारती अखेरचा श्वास घेतला. आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर चंदनवाडी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंतिम संस्कार होणार आहेत. आज माझी आई आणि माझे गुरू गेले. सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला असला तरी असे पुरस्कार सरकारने वेळेत द्यावेत, स्मृती जाते तेव्हा पुरस्कार कळत नाही, अशी खंत त्यांचे पुत्र विजय यांनी व्यक्त केली. (Aamir Khan)