सातारा : चिमुकल्या बहीण-भावाचा दुर्दैवी अंत; धान्यातील पावडरीच्या वासाने मृत्यू झाल्याचा अंदाज | पुढारी

सातारा : चिमुकल्या बहीण-भावाचा दुर्दैवी अंत; धान्यातील पावडरीच्या वासाने मृत्यू झाल्याचा अंदाज

कराड : पुढारी वृत्तसेवा मुंढे, ता. कराड येथील चिमुकल्या सख्या बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, धान्याची साठवणूक करत असताना त्यात टाकल्या जाणाया पावडरीच्या उग्र वासाने चिमुकल्या दोघांनाही त्रास झाल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.श्लोक अरविंद माळी (वय ३ वर्षे) व तनिष्का अरविंद माळी (वय७, दोघेही रा. मुंढे, ता. कराड) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, मुंढे येथील अरविंद माळी यांच्या घरात धान्य साठवून ठेवत असताना त्यामध्ये पावडरीचा वापर केला होता.त्या पावडरचा उग्र वास घरात येत असल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, या उग्र वासामुळेच श्लोक व तनिष्का यांना उलट्यांचा त्रास झाला. त्यामुळे सोमवार, दि. १३ रोजी प्रथम तीन वर्षांच्या श्लोकला उलट्या व खोकल्याचा त्रास होत असल्याने नातेवाईकांनी त्याला कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असतानाच सोमवारी त्याचा मृत्यू झाला. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी त्याची मोठी सात वर्षांची बहीण तनिष्का हिलाही उलट्या व खोकल्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिलाही नातेवाईकाने रुग्णालयात दाखल केले. दरम्यान उपचार सुरू असताना तिचाही मंगळवारी मृत्यू झाला. तीन वर्षाच्या श्लोकच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यामध्ये अंतर्गत अति रक्तखाव व शरीरातील पाणी कमी झाल्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले तर निष्काचे मंगळवारी सायंकाळी शवविच्छेदन केले असून त्याचा अहवाल पोलिसांना अद्याप मिळाला नसल्याने तिच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, या घटनेने मुंडेसह परिसरात व्यक्त केली जात आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव करत आहेत.

हेही वाचा

Back to top button