पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये रक्तदान शिबिरे मोठ्या प्रमाणात आयोजित होतात. मात्र, राज्यातील ग्रामीण भागांमध्ये आजही रक्ताचा तुटवडा जाणवतो. रक्त मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना शहराकडे धाव घ्यावी लागते. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्व गावे, शहरांमधील धार्मिक स्थळांनी रक्तदान शिबिरे आयोजित करण्याची आवश्यकता आहे. रक्तदान शिबिरांची संख्या वाढल्यास शासकीय रक्तपेढ्या तसेच रुग्णालयांशी संलग्न रक्तपेढ्या समृद्ध होतील आणि गरिबांची रक्तासाठी धावपळ थांबेल. खासगी रक्तपेढ्यांनी गरजूंना आर्थिक सवलत द्यायला हवी. शासनाने रक्तदान शिबिरांना पाठिंबा दिला पाहिजे.
– राम बांगड, रक्ताचे नाते ट्रस्ट
राज्यातील सर्वाधिक शतकवीर रक्तदाते पुण्यामध्ये आहेत. नियमित रक्तदान केल्याने सुदृढ, निरोगी राहता येते. साठवून ठेवलेल्या पाण्यापेक्षा प्रवाही पाणी शुध्द असते, तीच परिस्थिती रक्ताबाबतीतही असते. रक्तदानामुळे माझा कोरोनापासून बचाव झाला तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, असा कोणताही त्रास नाही.
– डॉ. शंकर मुगावे, ससून रुग्णालयाच्या समाजसेवा अधीक्षक कार्यालयाचे विभागप्रमुख