नाशिक : तोंडावर विषारी औषध उडाल्याने शेतकर्‍याचा मृत्यू | पुढारी

नाशिक : तोंडावर विषारी औषध उडाल्याने शेतकर्‍याचा मृत्यू

नाशिक (सिन्नर) : शेतातील पिकांना औषध फवारणी करीत असताना विषारी औषध तोंडवर उडाल्याने बेशुद्ध झालेल्या शेतकर्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (नाशिक)

नंदू विठ्ठल जाधव (40, रा. माळेगाव एमआयडीसी, सिन्नर) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जाधव हे 23 मार्च रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास शेतात औषधफवारणी करत असताना तोंडावर विषारी औषध उडाल्याने बेशुद्ध झाले. त्यांना उपचारार्थ आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस नाईक आव्हाड करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button