Raj Thackeray: …हा तर ‘स्वभाव’ आणि ‘वागणुकी’चा पराभव – राज ठाकरे | पुढारी

Raj Thackeray: ...हा तर 'स्वभाव' आणि 'वागणुकी'चा पराभव - राज ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटक निवडणुकीतील पराभव म्हणजे स्वभाव आणि वागणुकीचा हा परिणाम आहे. आपलं कोणीच वाकडं करू शकत नाही, अशा विचारांचा हा पराभव आहे; असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटले आहे. अंबरनाथ येथून राज ठाकरे हे माध्यमांशी बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, जनतेला आणि लोकांना कधीही कोणत्याही पक्षाने गृहित धरू नये. कर्नाटक निकालावरून सर्वच पक्षांनी बोध घ्यावा; असा सल्ला देखील कर्नाटक निवडणुकीवर माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी दिला. माध्यमांनी राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’ ला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला असला तरी, याचा चांगलाच परिणाम झाल्याचे कर्नाटक निवडणुकीतून दिसून आले आहे, असेही त्यांनी (Raj Thackeray)  म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button