जालना : सराईत गुन्हेगाराकडून दाेन पोलिसांवर खंजीराने हल्ला
जालना : पुढारी वृत्तसेवा
येथील खादगाव शिवारातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या सिध्दार्थ ॲग्रो कंपनीत चंदनझिरा ठाण्यातील दोन पोलिसांवर सराईत गुन्हेगार पप्पू घोरपडे व त्याचे तीन साथीदारांनी खंजीराने हल्ला केला.
खादगाव शिवारातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या मंगळवारी रात्री एका कंपनीत खंडणी वसुलीसाठी सराईत गुन्हेगार पप्पू घोरपडे व त्याचे तीन साथीदार गेले हाेते. ते खंजीर घेऊन गोंधळ घालत होते. याची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार मनसुब वेताळ आणि पो.कॉ. प्रभाकर वाघ हे त्याठिकाणी तातडीने दाखल झाले. यावेळी पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. जमादार वेताळ आणि पोलिस कर्मचारी वाघ यांच्यावर सराईत गुन्हेगार पप्पू घोरपडे व त्याचे तीन साथीदारांनी खंजीराने हल्ला केला.
- up election : आगामी उ. प्रदेश विधानसभा निवडणुकीत जाहीर सभा न घेण्याचा काँग्रेसचा निर्णय
- IND vs SA : चेतेश्वर पुजाराचे अर्धशतक!
या हल्ल्यात वेताळ यांच्या छातीला गंभीर इजा झाली. तर वाघ यांच्या हाताला गंभीर स्वरूपाची जखम झाली आहे. हे दोन्ही पोलीस कर्मचारी जालना येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
याप्रकरणी पप्पू कचरू घोरपडे, नवनाथ शिवदास नाईकवाडे, तेजराव खडेकर (तिघेही रा. खादगाव) आणि चंदू आंबीलढगे (रा. शेकटा) या चाौघांविराेधात पोलीस कर्मचारी प्रभाकर वाघ यांच्या फिर्यादीवरून भादंवि. 307, 353, 337, 332, 333, 326, 324, 504, 506, 34 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक देवीदास शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सावळे करीत आहेत.
हेही वाचलं का?