देवेंद्र फडणवीस यांनी कधीच जातीचे राजकारण केले नाही : बावनकुळे | पुढारी

देवेंद्र फडणवीस यांनी कधीच जातीचे राजकारण केले नाही : बावनकुळे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेते आहेत. त्यांनी जाती पातीचे राजकारण कधीही केलं नाही. पण त्यांच्या जातींवरून अश्लील शब्दात मनोज जरांगे यांनी टीका केली. 2014 ते 2019 मध्ये त्यांनी रात्र रात्र जागून आरक्षण दिलं, पण ते ज्यांनी टिकवल नाही त्यांच्याबद्दल का बोललं जातं नाही. त्यांच्या घरावर का जात नाहीत असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. त्यांना सागर बंगला आणि फडणवीस हेच का दिसत आहेत. फडणवीस यांनी जरांगे यांना आतापर्यंत संरक्षण दिले आहे. जरांगे यांचा जीव कसा वाचेल? यासाठीच फडणवीस यांनी प्रयत्न केले आहेत. फडणवीसांवर अशा प्रकारे जे निषेधार्ह वक्तव्य केल्या जात आहे, ते मराठा समाजाला अजिबात मान्य नाही आणि महाराष्ट्रातील जनतेला देखील मान्य नाही. फडणवीस आमचं नेतृत्व आहे, त्यांचा अपमान आम्ही कदापिही सहन करणार नाही असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिला.

हेही वाचा

 

Back to top button