प्रशासकीय कामांचा शंभूराज देसाईंना विसर? : सुषमा अंधारे | पुढारी

प्रशासकीय कामांचा शंभूराज देसाईंना विसर? : सुषमा अंधारे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : लवकरच पुन्हा राजकीय भूकंप होणार, अशी भविष्यवाणी करणारे शंभूराज देसाई यांना मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांच्या अगल बगल फिरताना प्रशासकीय कामाचा विसर पडतोय का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

सध्या गाजत असलेल्या प्रकरणात ललित पाटील, भूषण पाटीलसह इतर चार आरोपी असून डीन संजय ठाकूर त्यांचे स्वीय सहाय्यक आणि डॉक्टर गुंतले आहेत. मुळात हर्निया रोगाच्या उपचारासाठी नऊ महिने लागतच नाहीत. ससून हॉस्पिटलमध्ये मागील दीड वर्षापासून पंचतारांकित व्यवस्थेचा ते आनंद घेत होते. शेवटी हे सारे कोणाच्या आशीर्वादाने? याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले पाहिजे, असेही सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या.

मात्र, ड्रग्स माफिया ललित पाटील का पळून गेला? याचे उत्तर ना हॉस्पिटल प्रशासनाने दिले, ना सरकारने. स्वतः ललित पाटील यांनीच खुलासा केला आहे की, मला पळवले गेलंय. याला जबाबदार कोण? तो ससूनमधून बाहेर पडल्यावर गाडीची मदत कोणी केली? पैशाची मदत कोणी केली? नाशिकहून गुजराला जाणे आणि परत नाशिकला येणे. हा सगळा प्रवास सहज शक्य आहे का? नाशिकमध्ये 300 कोटींचा कारखाना उभा कसा राहतो, पालकमंत्री म्हणून दादा भुसे यांचीही जबाबदारी आहे.

दादा भुसेंना या गोष्टी माहीतच नाही असं ते म्हणत असतील तर ते फेल आहेत. माहिती असेल तर त्यांनी हे चालू कसे दिले? संपूर्ण राज्यात एमडी सप्लाय होत असताना सोलापूरमध्येही असा कारखाना सापडला. येरवडा कोर्ट परिसरात चरस सापडलं, हे सहज शक्य कसे? असा सवाल सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने दौऱ्यासाठी आल्यानंतर विमानतळावर उपस्थित केला.

हेही वाचा :

Back to top button