चंद्रपूर- अहेरी मार्गावर ट्रकची २ दुचाकींना धडक; ३ ठार | पुढारी

चंद्रपूर- अहेरी मार्गावर ट्रकची २ दुचाकींना धडक; ३ ठार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूरला निघालेल्या दोन दुचाकीस्वारांना ट्रकने उडवले. या अपघातात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना चंद्रपूर-अहेरी मार्गांवरील आक्सापूर जवळकाल रविवारी घडली. अमृत सुनील सरकार (वय 32, रा. कालीनगर), शैलेंद्र कालिदास रॉय (वय 63, रा. विजय नगर), मनोज निर्मल सरदार (वय 43) असे मृतांची नावे आहेत. Chandrapur

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या मुलचेरा तालुक्यातील कालीनगर येथील अमृत सरकार, मनोज सरदार आणि विजयनगर येथील शैलेद्र रॉय हे तिघे दोन दुचाकींवरून चंद्रपूरला निघाले होते. चंद्रपूर-अहेरी मार्गांवरील आक्सापूर येथील मंदिरासमोर जवळ चंद्रपूर येथून सूरजागडला निघालेल्या हायवाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती कोठारी, गोंडपिपरी पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, हायवाचा चालक फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास कोथरी पोलीस करीत आहेत. Chandrapur

Chandrapur  चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात अपघाताची संख्या वाढली

सुरजागड येथून खनिज घेऊन धावणाऱ्या अवजड वाहनामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात अपघाताची संख्या वाढली आहे. वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली करणाऱ्या सुरजागड येथून धावणाऱ्या वाहनावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

हेही वाचा 

Back to top button