अमरावती, पुढारी वृत्तसेवा: कारागृह म्हटलं की, शिक्षा भोगत असलेले बंदीजण आपल्या डोळ्यापुढे येतात. कित्येक वर्ष शिक्षा भोगत असताना बंदीजण हे कुटुंबापासून तुटलेले असतात. त्यांच्यात कौटुंबिक जिव्हाळा वाढावा, म्हणून महाराष्ट्र दिनी बुधवारी (दि.१) अमरावती येथील मध्यवर्ती जिल्हा कारागृहात गळाभेटीचा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.