अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून मुख्यमंत्री अस्वस्थ : अनिल देशमुख | पुढारी

अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून मुख्यमंत्री अस्वस्थ : अनिल देशमुख

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून मुख्यमंत्री अस्वस्थ झाले आहेत. ते बोलून दाखवत नाहीत. मात्र, ते अस्वस्थ आहेत, असा दावा माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल देशमुख यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयाने नबाब मलिक यांना जामीन दिला. आम्हा सर्वांनाच याचा आनंद आहे. खोट्या प्रकरणात त्यांना अडकविण्यात आले होते. तसेच राजकारणाच्या माध्यमातून त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. विरोधकांवर राजकारणापोटी कारवाई करण्यात येत आहे, असा आरोपही देशमुख यांनी केला. राज्यात आणि दुसरीकडे सत्ता पक्षाच्या विरोधी सरकार आहे. त्यांना राजकीय विरोध करण्याचे काम सुरू आहे. राजकीय विरोधकांना त्रास देण्याचे काम सुरू आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button