पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. त्यांना २१ मार्च रोजी अंमलबजावणी संचालनालयाच्या नऊ समन्सनंतर अटक करण्यात आली होती. त्यांनतर ते ५० दिवस ईडीच्या कस्टडीत होते. अखेर त्यांना शुक्रवारी (दि.१०) जामीन मंजूर झाला. मात्र जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांना काही अटी घातल्या आहेत, ज्यांचे पालन त्यांना करावे लागणार आहे.
हेही वाचा :