मोहोळ : केंद्राने साखर निर्यातीवरील बंदी उठवली | पुढारी

मोहोळ : केंद्राने साखर निर्यातीवरील बंदी उठवली

टाकळी सिकंदर ; पुढारी वृत्तसेवा : गतवर्षी देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले, तसेच आगामी हंगामातही विक्रमी साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने साखर निर्यादीवर बंदी घातल्यामुळे बहुतांश साखर कारखानदारांकडून विविध बंदरावर पोहचवण्यात आलेली साखर पडून आहे. याबाबत राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांच्याकडेे साखर निर्यातची परवानगीची मागणी केली होती, त्यावर ताबडतोब निर्णय घेऊन, केंद्र सरकारने साखर निर्यातीवर घातलेले निर्बंध 20 जुलैपर्यंत हटवण्याचा निर्णय घेतला. पुढील 15 दिवसांत देशभरातील कच्ची साखर निर्यात करायला कारखान्यांना परवानगी देण्यात आली. त्यामुळे देशातील सर्वच साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यसभेवर निवडून गेल्याबरोबर, खासदार धनंजय महाडिक यांनी लगेचच कामाला सुरूवात केली, त्यानी पहिलीच मागणी केंद्र सरकारकडून मान्य करून घेतली. खासदारकीची शपथ घेण्यापूर्वीच कारखानदारीचे प्रश्न मांडून त्याला यश मिळवले असून सर्व कारखानदारांच्यावतीने धनंजय महाडिक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने साखर निर्यातीवर निर्बंध घातल्याने, देशातील सर्वच साखर कारखान्यांकडे साखरेचा मोठ्याप्रमाणात साठा शिल्लक आहे.
नुकत्याच संपलेल्या गळीत हंगामात, देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले. त्यातून अनेक साखर कारखान्यांकडे कच्ची आणि पक्की साखर पडून आहे. देशातील साखर कारखान्याकडे कच्च्या साखरेचा पाच लाख टनाचा शिल्लक साठा आहे. तर विविध बंदरांवर सुमारे 2 लाख टन कच्ची साखर पडून आहे. ती निर्यातीसाठी बंदरावर पोचवलेली साखर, केंद्र शासनाच्या निर्बंधांमुळे तसिच पडून राहीली. परिणामी या साखरेचा दर्जा खालावण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे साखरेच्या निर्यातीवर बंदी घातल्याने, दर ढासळून, साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकर्यांचे मोठे नुकसान होऊ शकते, हे महाडिक यांनी ओळखून ते टाळण्यासाठी केंद्र सरकारने साखर निर्यातीबद्दल धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी, यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे प्रत्यक्षात भेट घेऊन केली होती. त्याची दखल घेऊन, साखरेच्या निर्यातीवरील बंदी 15 दिवसांसाठी उठवण्याचा निर्णय, केंद्र सरकारने घेतला आहे.

केंद्र शासनाचा हा निर्णय साखर क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून, त्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल साखर उद्योग अभ्यासक पी. जी. मेढे यांनी, खासदार महाडिक यांना धन्यवाद दिले. केंद्रशासनाने निर्यात बंदी 15 दिवसांसाठी हटवल्याने साखर कारखानदारीसह संबंधित सर्व घटकांना त्याचा मोठा फायदा होईल, असे मत साखर उद्योग अभ्यासक पी. जी. मेढे यांनी व्यक्त केले. खासदार धनंजय महाडिक यांनी खासदार झाल्यानंतर लगेचच विविध प्रश्नांचा अभ्यास करून, त्याच्या सोडवणुकीसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू केलाय. साखर निर्यात बंदीमुळे देशभरातील साखर कारखान्यांसमोर उभा राहिलेला महत्त्वाचा प्रश्न सोडवण्यात, खासदार धनंजय महाडिक यशस्वी झाले आहेत. खासदार धनंजय महाडिक यांनी हा प्रश्न सोडवल्याबद्दल साखर कारखानदारीतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्याकडे मुबलक साखर आहे. साखर विक्रीअभावी शेतकर्‍यांची देणी, कामगारांचा पगार, ट्रॅक्टर टोळीचे नवीन करार अशी देणी देणे बाकी आहे. खा. धनंजय महाडिक यांनी साखर निर्याती संदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार केंद्राने मुदतवाढ दिली. याचा फायदा कारखानदारांना होणार
– सतीश जगताप
व्हाईस चेअरमन, भीमा शुगर

Back to top button