सातारा : सुर्ली गावाजवळ भीषण अपघात; आर्वी येथील तिघांचा मृत्यू | पुढारी

सातारा : सुर्ली गावाजवळ भीषण अपघात; आर्वी येथील तिघांचा मृत्यू

कोरेगाव : पुढारी वृत्तसेवा;  सुर्ली (ता. कोरेगाव) येथे रविवारी रात्री १० च्या सुमारास इर्टिका गाडी पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात साताऱ्या जिल्ह्यातील आर्वी (ता. कोरेगाव) येथील तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

आर्वी (ता .कोरेगाव) येथील तुकाराम आबाजी माने (वय. 65 ), तानाजी आनंद माने (वय. 62) सुभाष गणपत माने (वय. 60 ) हे तिघेजण साताराहून आर्वीकडे येत होते.  सुर्ली गावानजीक असलेल्या वळणावर इर्टिका गाडीचा ताबा सुटल्याने ही गाडी पलटी झाली. या भीषण अपघातामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाली होते. जखमी तिघांना वाठार किरोली येथील युवक सातारा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करत असतानाच रस्त्यातच या तिघांचा दुर्दैवी अंत झाला. तिघांच्या अकाली अपघाती मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

Back to top button