Nashik : सटाण्यात वीज पडून बैलजोडीचा मृत्यू | पुढारी

Nashik : सटाण्यात वीज पडून बैलजोडीचा मृत्यू

नाशिक (सटाणा) : तालुक्यातील केरसाणे येथे शुक्रवारी (दि.10) सायंकाळी पावसादरम्यान वीज कोसळल्याने सुरेश माळी या शेतकर्‍याच्या बैलजोडीचा मृत्यू झाला आहे. शेजारील वीरगाव येथेही एका दुकानावर झाड पडून मोठे आर्थिक नुकसान झाले. तालुक्यात ठिकठिकाणी डांगसौंदाणे, वीरगाव, केरसाणे गाव परिसरात जोरदार पाऊस झाला. (Nashik)

केरसाणे येथील मुंगसे रस्त्यावरील सुरेश माळी या शेतकर्‍याच्या शेतात झाडाखाली बांधलेले दोन बैल वीज पडल्याने मृत्युमुखी पडल्याने हजारोंचे नुकसान झाले. महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. वीरगाव येथे गावातील राजेंद्र देवरे यांच्या दुकानावर झाड कोसळल्याने दुकान जमीनदोस्त झाले. दुकानातील लेडिज आर्टिकल व कटलरी मालाचे हजारो रुपयांच्या मालाचे नुकसान झाले, तर शहर परिसरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.

हेही वाचा :

Back to top button