धाराशिव : 'मराठ्यांना आरक्षण मिळेना त्यापेक्षा'; आरक्षणासाठी परांड्यातील व्यक्तीने गमावला जीव
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आणखी टोकाचे पाऊल उचलण्याची मालिका सुरुच आहे. धाराशिवच्या परांडा तालुक्यात आणखी एका व्यक्तीने मराठा आरक्षणासाठी जीव गमावला आहे. बळीराम साबळे (वय-४७) असे टोकाचे पाऊल उचललेल्या व्यक्तीचे नाव आहे.
बळीराम साबळे सकाळी दहा, साडेदहाच्या सुमारास पुतण्या गणेश साबळे याच्याशी बोलत होते. घरातून बाहेर पडताना पुतण्या बळीरामशी ते म्हणाले, लका आपल्या मराठ्यांना आरक्षण मिळेना, त्यापेक्षा जीव गमावलेला बरा’ आणि तो घरातून बाहेर पडले. बळीराम साबळेंनी थेट आपले शेत गाठले आणि टोकाचे पाऊल उचलत जीव गमावला.
रानातून आपला पती कसं काय घरी येईना? म्हणून पत्नी हिराबाई बळीराम साबळे ह्या शेतात त्यांना पाहण्यासाठी गेले असता, बळीराम साबळे मृत अवस्थेत दिसून आले. त्यांनी तात्काळ गावात येऊन बापू मिस्कीन यांना सांगितले. गावातील प्रतिष्ठित लोकांना माहिती दिली व त्यांच्यासह ते थेट घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळावरून तहसीलदार घनश्याम अडसूळ व पोलीस बीट अंमलदार बळीराम शिंदे, पोलीस पोलीस कॉन्स्टेबल यांना घटनेची खबर दिली.