मराठा आरक्षण प्रश्न: गोदावरीत जलसमाधीसाठी गेलेला आंदोलक ताब्यात
वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण: प्रश्न तात्काळ साेडविण्यात यावा, या मागणीसाठी जलसमाधी घेण्याचा इशारा दिलेला आंदोलक मनोज जरांगे-पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मराठा आरक्षण: प्रश्नी बलिदान देणार्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदाेलन करण्यात येणार हाेते. शहागड येथील उड्डाणपूलारून उडी मारुन जलसमाधी घेईन., असा इशारा मनोज जरांगे-पाटील याने दिले हाेते.
- बिहार , आंध्र प्रदेश राज्यांची वाटचाल ‘कोरोनामुक्त’कडे
- मालेगाव : पोलिस उपमहानिरीक्षक अन् मालेगाव महसूलची कारवाई, नगरसेवक संशयाच्या भोवऱ्यात
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ४५ मराठा बांधवांनी आपले बलिदान दिले होते. याला तीन चार वर्षे उलटून गेली आहेत. तरीही सरकार मराठा समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारनेच बलिदान देणार्या कुटुंबीयांना आश्वासन दिले होते.
- Nhava Sheva Port : एकनाथ शिंदे न्हावाशेवा मार्गाची आज करणार पाहणी
- ‘ठिपक्यांची रांगोळी’ : नव्या मालिकेतील ज्ञानदा रामतीर्थकर कोण आहे?
प्रत्येक कुटुंबाला शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी मिळेल. त्यांनी १० लाख रुपये देण्याचे कबुल केले होते. यामुळे सरकारने २८ सप्टेंबरपर्यंत मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबियांच्या सर्व मागण्या मान्य केल्या नाहीत. तर २९ सप्टेंबर रोजी, शहागड येथील उड्डाणपूलारून उडी मारुन जलसमाधी घेईन, असा इशारा मनोज जरांगे-पाटील याने दिला हाेता.
- Hindu Rashtra : “गांधी जयंतीपर्यंत देशाला हिंदू राष्ट्र घोषीत करा अन्यथा…”
- jayakwadi dam : जायकवाडी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता
माझ्या जलसमाधीनंतर राज्यात सकल मराठा समाजाकडून जी काही असंतोषाची लाट उसळेल. त्या उद्रेकास सर्वस्वी जबाबदार हे सरकारचं असेल, असा इशाराही त्याने सरकारला दिला हाेता. याची प्रशासनाने दखल घेतली.
गोंदी पोलिसांनी वेळीच मनोज जरांगे यांना सकाळी ६ वाजता ताब्यात घेतले. यावेळी गोंदी पोलिसांनी शहागड गोदावरी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. यावेळी गोंदी ठाण्याचे पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, पोलिस उपनिरीक्षक गजानन कौळासे व पोलिस कर्मचारी होते.
हेही वाचलं का ?