Diabetes : जेवल्यानंतर फक्त 5 मिनिटे हे काम करा, मधुमेह नियंत्रणात राहील | पुढारी

Diabetes : जेवल्यानंतर फक्त 5 मिनिटे हे काम करा, मधुमेह नियंत्रणात राहील

पुढारी ऑनलाइन डेस्क : Diabetes : जेव्हा शरीरातील ग्लुकोजची पातळी खूप वाढते तेव्हा मधुमेहाची समस्या उद्भवते. इन्सुलिन हे समतोल राखण्यास खूप मदत करते. इन्सुलिन हा स्वादुपिंडातून बाहेर पडणारा हार्मोन आहे. जो रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्याचे काम करतो. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की जेवणानंतर हलके चालणे रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकते. या संशोधनाविषयी सविस्तर जाणून घेऊया.

जेवणानंतर थोडा वेळ चालल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते, असे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे. स्पोर्ट्स मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात, संशोधकांनी दीर्घकाळ बसण्याऐवजी उभे राहणे आणि चालणे यासारख्या हलक्या शारीरिक हालचालींमुळे इन्सुलिन आणि रक्तातील साखरेच्या पातळीसह हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो यावरील सात वेगवेगळ्या अभ्यासांचे विश्लेषण केले. Health Tips

Health Tips : रात्रीच्या जेवणानंतर चालावे का आणि किती चालावे?

Diabetes संशोधनाचे परिणाम पाहता, संशोधकांनी सुचवले की दुपारचे किंवा रात्रीचे जेवण घेतल्यानंतर, बसून राहणे किंवा झोपण्याऐवजी, 2 ते 5 मिनिटे हलके चालणे रक्तातील साखरेची पातळी सुधारू शकते. याशिवाय जेवण केल्यानंतर थोडा वेळ उभे राहिल्यास रक्तातील साखरेची पातळीही कमी होऊ शकते.

या अभ्यासाचे लेखक एडन बुफे यांनी आरोग्य वेबसाइटला सांगितले की, ‘हलकी हालचाल तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.’

Health Tips : यामुळे रक्तातील साखरेची पातळी कशी कमी करू शकतात?

Diabetes जेव्हाही तुम्ही काही खाता – विशेषत: जास्त कार्बोहायड्रेट असलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू लागते. याला पोस्टप्रॅन्डियल स्पाइक म्हणून ओळखले जाते. शरीरातील रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढल्याने इन्सुलिन नावाचा संप्रेरक बाहेर पडतो, जो रक्ताद्वारे पेशींमध्ये ग्लुकोज पाठवतो जेणेकरून त्याचा ऊर्जेसाठी वापर करता येईल.

परंतु रक्तातील साखरेची पातळी आणि इन्सुलिनमधील हे संतुलन अतिशय नाजूक आहे आणि ते नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) नुसार, जर शरीरात रक्तातील साखरेची पातळी सतत वाढत असेल तर पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देणे थांबवू शकतात आणि इन्सुलिन प्रतिरोधक बनू शकतात. ज्यामुळे प्री-डायबेटिक किंवा टाईप 2 मधुमेह होऊ शकतो.

Sleep alart : कमी झोप तुम्हाला अधिक स्वार्थी बनवू शकते; जाणून घ्या सविस्तर

अशा परिस्थितीत, या नवीन अभ्यासाच्या लेखकाचे म्हणणे आहे की जर तुम्ही जेवणानंतर हलके चालले तर ते रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकते, ज्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.

संशोधकांना असे आढळून आले की जेवणानंतर बसण्याऐवजी थोडावेळ चालणे किंवा उभे राहणे यामुळे ग्लुकोजची पातळी कमी होऊ शकते. परंतु, या अभ्यासाच्या लेखकाच्या मते, हलके चालणे खूप फायदेशीर ठरू शकते, ते जेवणानंतर इन्सुलिनची पातळी देखील सुधारते.

शेवटी, संशोधकांनी असे सुचवले आहे की जेवणानंतर हलके चालणे केवळ रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकत नाही तर इन्सुलिनची पातळी देखील राखू शकते. याशिवाय या अभ्यासाच्या लेखकाने असेही म्हटले आहे की दिवसभरात कमी वेळात चालणे देखील खूप फायदेशीर ठरू शकते.

शक्य असल्यास दिवसभरात बसण्याची वेळ कमी करा, असेही बुफे म्हणाले. जर तुमचे काम बसून करायचे असेल, तर दर 20 ते 30 मिनिटांनी उठून थोडे चालत जा. रक्तातील साखरेची पातळी देखील या मार्गांनी नियंत्रित केली जाऊ शकते.

मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे फार महत्वाचे आहे. त्याच वेळी, तुम्हाला मधुमेहाची समस्या असेल तर, रक्तातील साखरेची पातळी राखणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून तुम्हाला दृष्टी कमी होणे, हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि किडनीच्या आजारांना सामोरे जावे लागणार नाही.

Diabetes अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या हेल्थ केअर प्रोग्रामच्या उपाध्यक्ष लॉरा हिरोनिमस यांनी सांगितले की, तुमच्या रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करून तुम्हाला भविष्यात मधुमेहाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. लॉराने असेही सांगितले की दिवसभर रक्तातील साखरेची पातळी राखून ठेवल्याने ऊर्जा पातळी देखील वाढते.

CDC च्या मते, दिवसभर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी, भरपूर फळे आणि भाज्यांसह निरोगी आहार घेणे, निरोगी वजन राखणे आणि नियमित शारीरिक हालचालींमध्ये भाग घेणे महत्वाचे आहे. याशिवाय या गोष्टीही लक्षात ठेवा-
तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीचा मागोवा ठेवा. दिवसभर काहीतरी खात राहा, भूक लागण्याची चूक करू नका. रस, सोडा किंवा अल्कोहोल ऐवजी पाणी प्या. Diabetes

झेपावे चंद्राकडे…

वास्तु शास्त्र : ईशान्य दिशेचे काय आहे महत्त्व? या दिशेला ‘या’ वस्तू ठेवल्या तर होईल मोठे नुकसान

Back to top button