घोडा पित नाही घाणेरडे पाणी! | पुढारी

घोडा पित नाही घाणेरडे पाणी!

लंडन : मानवासह अनेक प्राण्यांच्या वेगवेगळ्या सवयी असतात. काही प्राणी बसूनच झोपतात, तर काही उभ्या उभ्याच झोप घेतात. घोडा हा प्राणी असा उभ्या उभ्याच झोप काढतो आणि त्याला झोपेत खाली पडण्याची भीतीही नसते. घोड्याचे इतकेच वैशिष्ट्य आहे असे नाही. घोडा फक्त स्वच्छ आणि साफ पाणीच पितो. घोडा कधीच घाणेरडं, अस्वच्छ पाणी पित नाही, असे का? यामागचे कारण काय? असे मानले जाते की, घोडे गलिच्छ पाणी ओळखतात आणि ते पित नाहीत. ते नेहमी स्वच्छ पाणी पितात. एवढचं नव्हे तर घोड्याने नाकारलेले पाणी माणूसही पिऊ शकत नाही. असं का?

जुनी माणसं बोलतात त्यात सत्य आहे. कारण, घोडे दूषित किंवा विषारी पाणी पित नाहीत. हॉर्सरेसिंगसेन्सच्या अहवालानुसार, घोडे दूषित किंवा दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यास आवडत नाहीत. एवढेच नाही तर घोड्यांना वास आणि चवीची तीव्र जाणीव असते. ज्यामुळे त्यांना गलिच्छ पाणी पिणे टाळता येते. म्हणूनच घोडे गलिच्छ पाणी ओळखतात आणि ते पित नाहीत. कारण, ते त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. अहवालानुसार, जर पाणी चवदार नसेल आणि स्वच्छ दिसत नसेल. त्या स्थितीत घोड्याला लगेच समजेल की त्याने हे पाणी पिऊ नये. तथापि, बर्‍या वेळा निळ्या-हिरव्या शैवालसारखे विषारी पदार्थ घोड्याला नैसर्गिक वाटतात.

या स्थितीत घोडे ते पाणी पिऊ शकतात. पण, जर पाण्याची चव खराब असेल किंवा दूषित असेल, तर घोडे ते पाणी कोणत्याही परिस्थितीत पिणार नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे घोडे पाण्याची चव ओळखू शकतात. याचे एक मोठे उदाहरण म्हणजे पाणी स्वच्छ असले, तरी त्यात थोडा वास येत असेल तर त्या स्थितीतही घोडा पाणी पिणार नाही. माहितीनुसार, घोडे त्यांच्या आकाराच्या तुलनेत खूपच कमी पाणी पितात. कारण ते मुख्यतः गवतांवर अवलंबून असतात.

ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण खूपच कमी असते. मोठ्या प्रमाणात फायबर प्रभावीपणे पचवण्यासाठी आणि त्यांच्या शरीराचे तापमान राखण्यासाठी घोड्यांना पाण्याची आवश्यकता असते, जे अंशतः घामाने होते. बहुतेक घोडे दिवसातून पाच ते दहा गॅलन पाणी पितात. मात्र, अनेक वेळा कुंडातील घाणामुळे घोडे दिवसभर पाणी पित नाहीत. त्यामुळे घोडे स्वच्छ पाणी पितात हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.

Back to top button