औरंगाबाद : स्वत:च्या गुन्ह्यांवर पडदा टाकण्यासाठीच शिवसेनेचे आरोप : रावसाहेब दानवे | पुढारी

औरंगाबाद : स्वत:च्या गुन्ह्यांवर पडदा टाकण्यासाठीच शिवसेनेचे आरोप : रावसाहेब दानवे

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा: ईडी, सीबीआयची कारवाई आताच होत नसून, यापूर्वी काँग्रेसच्या काळातही झाल्या आहेत. भाजपचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या कृत्यावर पांघरूण घालण्यासाठीच या कारवाईला शिवसेना विरोध करीत आहे. त्यांनी स्पष्टीकरण देऊन यातून बाहेर पडावे, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.

विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार्‍या आढावा बैठकीला जाण्यापूर्वी पत्रकारांशी राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संवाद साधला. संजय राऊत यांच्यावरील कारवाईवर प्रतिक्रिया देताना ते म्‍हणाले, “ईडी, सीबीआयची कारवाई आताच होत नसून, यापूर्वी काँग्रेसच्या काळातही झाल्या आहेत. भाजपचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या कृत्यावर पांघरूण घालण्यासाठीच या कारवाईला शिवसेना विरोध करीत आहे.”

हेही वाचा : 

Back to top button