औरंगाबाद : दोन मुख्यमंत्र्यांची भेट ही काही वेगळी गोष्ट नाही : फडणवीस | पुढारी

औरंगाबाद : दोन मुख्यमंत्र्यांची भेट ही काही वेगळी गोष्ट नाही : फडणवीस

औरंगाबाद, पुढारी वृत्‍तसेवा : तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट ही काही वेगळी गोष्ट आहे असे मला वाटत नाही. दोन राज्याचे मुख्यमंत्री भेटतच असतात, असे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी लासूर स्टेशन येथे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, या सर्व मंडळींनी मागील लोकसभा निवडणुकीत देखील हातात हात घालून मोठी आघाडी केली होती. पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. उत्तरप्रदेश सह इतर राज्यातही हा प्रयोग करून बघण्यात आला होता. तो अयशस्वी ठरला आहे. तेलंगणामध्ये मुख्यमंत्री राव यांच्या टीआरएस पक्षाची स्थिती वाईट असून लोकसभा निवडणुकीत भाजप तेथे एक क्रमांकाचा पक्ष ठरेल.

तसेच, महाविकास आघाडीकडून निराशेच्या भावनेतून सुडाचे राजकारण सुरू आहे. नारायण राणे व त्यांची मुले, किरीट सोमय्या तसेच रवी राणा यांच्याबद्दल जे चालू आहे ते सर्व महाराष्ट्र बघत असल्याची टीका ही फडणवीस यांनी केली.

हे ही वाचलं का 

Back to top button