अकोला: अतिवृष्टीमुळे ८ हजार १२४ हेक्टरमधील पिकांचे नुकसान | पुढारी

अकोला: अतिवृष्टीमुळे ८ हजार १२४ हेक्टरमधील पिकांचे नुकसान

अकोला: पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यामध्ये 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या संततधार पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे सोयाबीन, कापूस, तुर व भाजीपालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्राप्त झालेल्या अहवालानुसार तेल्हारा, मुर्तिजापूर व अकोट तालुक्यातील 8 हजार 124 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधीत झालेले सोयाबीन, कापूस, तूर व भाजीपाल्यांचे तालुकानिहाय नुकसान याप्रमाणे : तेल्हारा तालुक्यात 1 हजार 413 हेक्टर आर, अकोट तालुक्यात 1 हजार 356 हेक्टर आर, तर मुर्तिजापूर येथे 5 हजार 355 हेक्टर असे एकूण 8 हजार 124 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. तसेच 1 जूनपासून आजपर्यंत 747.5 एमएम पाऊसाची नोंद झाली असून त्याचे प्रमाण 104.6 टक्के आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनाकडून प्राप्त झाली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button