पुणे : अपघाताला कारण ठरणारी वाहतूक बंद करा; राष्ट्रवादीचीमागणी | पुढारी

पुणे : अपघाताला कारण ठरणारी वाहतूक बंद करा; राष्ट्रवादीचीमागणी

आळंदी, पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठ दिवसांत आळंदी शहरात वडगाव रस्ता भागात अवजड वाहनांमुळे दोन अपघात झाले असून, यात दोन जणांना जीव गमवावे लागले. यामुळे शहरातून संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. अपघाताच्या दुर्दैवी घटना घडल्याने राष्ट्रवादी काँगेस पार्टी आक्रमक झाली असून, शहरातील अवजड वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळवा, रस्त्यांवर गतिरोधक बसवा, भरधाव वाहनांवर कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे.

आपल्या मागण्यांचे पत्र त्यांनी आळंदीचे पोलिस निरीक्षक रमेश पाटील यांना दिले. या वेळी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी डी. डी. भोसले पाटील, माजी नगरसेवक प्रकाश कुर्‍हाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रोहन कुर्‍हाडे, महिलाध्यक्षा रूपाली पानसरे, पुष्पाताई कुर्‍हाडे, सतीश कुर्‍हाडे, आरिफभाई शेख, चेतन कानडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

मंगळवारी झालेल्या अपघातात चार वर्षांच्या चिमुकलीला जीव गमवावा लागला असून, यापूर्वी 19 वर्षीय वारकरी विद्यार्थ्याचा असाच अपघाती मृत्यू झाला आहे .यामुळे शहरात सध्या रस्ते वाहतूक सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Back to top button