बारसू रिफायनरी प्रकरणी चर्चेतून मार्ग काढा : शरद पवारांचा उदय सामंताना सल्ला
पुढारी ऑनलाईन डेस्क : बारसू रिफायनरी प्रकरणी चर्चेतून मार्ग काढावा, असा सल्ला मी उद्योगमंत्री उदय सामंत यांना दिला आहे. बारसू येथील जमीन सरकारने ताब्यात घेतलेली नाही केवळ माती परीक्षण सुरु आहे. तसेच बारसूमध्ये काम थांबवले आहे, अशी उदय सामंत यांनी दिली आहे. रिफायनरीला स्थानिकांचा तीव्र विरोध असेल तर त्याची नोंद घेतली पाहिजे. असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज ( दि. २६) पत्रकार परिषदेत केलेली. (Barsu Refinery )
कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर बारसू सोलगाव परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग करणारी ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोलियम उद्योग’ प्रस्तावित आहे. याला बारसू सोलगाव येथील स्थानिकांचा विरोध आहे. सोमवार(दि.२४) पासून या रिफायनरी संदर्भात ड्रिलिंग करून मातीचे परिक्षण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बारसू सोलगाव येथील स्थानिकांनी जोरदार आंदोलन करत तीव्र विरोध केला. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही याला जोरदार विरोध होत असताना दिसत आहे.
Barsu Refinery : स्थानिकांच्या भावनांची नोंद घेतली पाहिजे
या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत शऱद पवार म्हणाले, मी उदय सामंताकडून बारसू परिस्थितीवर आढावा घेतला या प्रकरणी चर्चेतून मार्ग काढा असा सल्ला सामंत यांना दिला आहे. बारसू स्थानिकांचे काही प्रश्न असतील तर ते सोडवले पाहिजेत. स्थानिकांना विश्वासात घेण गरजेच आहे. स्थानिकांचा विरोध होत आहे. त्यांचा विरोध का होत आहे. त्यापाठीमागील कारण शोधावी, यातून मार्ग काढायला हवा. जर स्थानिकांच्या भावना एवढ्या तीव्र असतील तर त्याची नोंद घेतली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्ती केली. उदय सामंत स्थानिकांची बैठक घेणार आहेत. काय तोडगा निघतो तो पाहू, असेही पवार यावेळी म्हणाले.
आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई इथे माध्यम प्रतिनिधींशी विविध विषयांवर संवाद साधला. बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांवर बळाचा वापर करण्यात आला. या विषयाबाबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली. त्यावर स्थानिक आणि शासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 26, 2023
रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस.आंदोलक ठाम असून त्यात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे.खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावलं आहे.त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 25, 2023
सर्वेक्षण स्थगित करावं, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी आणि मार्ग काढावा. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीनं सर्वेक्षण करू नका, अशी सरकारला विनंती आहे. सर्वेक्षण त्वरित स्थगित करावं.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 25, 2023
हेही वाचा
- रिफायनरीसाठी बारसू हे ठिकाण उद्धव ठाकरेंनी सुचवलं होतं, अन् आता विरोध करताय : उदय सामंत
- Atiq-Ashraf murder case : उत्तर प्रदेश सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट
- नगर : महसूलमंत्री विखे पाटील यांच्या विकासकामांचे शेजारच्यांना दुःख ; खा. डॉ. सुजय विखे यांची टीका