जालना : वैतागवाडीच्या खदानीत बुडून दोन मुलींचा मृत्यू | पुढारी

जालना : वैतागवाडीच्या खदानीत बुडून दोन मुलींचा मृत्यू

शहागड; पुढारी वृत्तसेवा : अबंड तालुक्यातील गोंदी (वैतागवाडी) जवळील खदानीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींची बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. २४) घडली.  कमल सुभाष भानुदास (वय 14 वर्ष) आणि अर्शिन हुसेन शेख (वय 14 वर्ष) अशी मृत मुलींची नावे आहेत.

कमल भानुदास (वय 14 वर्ष) आणि अर्शिन शेख (वय 14 वर्ष) या दोन्ही मुली रा.गोंदी इदगाह येथील रहिवासी आहेत. अबंड तालुक्यातील गोंदी जवळील गोंदी(वैतागवाडी) जवळील खदानीत त्या कपडे धुण्यासाठी गेलेल्या होत्या.  यावेळी दगडावर बसताना एकीचा तोल जाऊन ती पाण्यात पडली. दुसरीने वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु ती देखील पाण्यात पडल्याने. दरम्यान दोघींना पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू झाला. खदानीवर असलेल्या एका लहान मुलाने ही घटना पाहिली त्याने जवळ असलेल्या रहिवाशा ही माहिती दिली. त्यानंतर दोघींना ही अर्ध्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. नातेवाईकंनी तिला खासगी वाहनातून शहागड येथे दवाखान्यात आणले होते. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

घटनेची माहिती पोलीस उपनिरीक्षक गणेश जागडे,शाकेर सिद्दिकी यांना मिळताच घटनास्थळ पंचनामा करुन गोंदी पोलीस ठाण्यात आकस्मात मदतीची नोंद घेण्यात आलेली आहे.

कमल सुभाष भानदास या मुलीचे मूळ गाव हालडोला ता बदनापूर जि.जालना आहे. ऊसतोडी करण्यासाठी ती आपल्या आई-वडीलांसोबत गोदी जवळील इदगाहा येथे राहत होती. तर अर्शिन हुसेन शेख ही मुळची गेवराई जि.बीड येथील आसून ती मागील चार वर्षांपासून गोंदी जवळील इदगाहा जवळ राहतात.

Back to top button