जालना: विजेचा धक्का लागून ६ गायींचा मृत्यू | पुढारी

जालना: विजेचा धक्का लागून ६ गायींचा मृत्यू

जालना: पुढारी वृत्तसेवा: परतूर तालुक्यातील मौजे अंबा येथे आज (दि.२६) बैल पोळ्याचा सण उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरू असतानाच विजेचा धक्का लागून गावातील सहा गायींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे बैलपोळा सणावर दुःखाचे सावट पसरले आहे. ग्रामस्थांमधून शोक व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button