वैद्यनाथ साखर कारखाना : पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर कारवाई
परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा : परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्याच्या कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी थकबाकी प्रकरणी थकीत रक्कम वसुली करण्याच्या संदर्भाने ईपीएफओच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाने बँक खाते सील केले असल्याची माहिती आहे. मात्र वैद्यनाथ साखर कारखाना परळीने कोणतेही बँक खाते जप्त झालेले नसून यासंदर्भात येत असलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचे कारखान्याने स्पष्टीकरण दिले आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे.
अधिक वाचा :
- नबाब मलिक म्हणाले, शरद पवार राष्ट्रपती होणार या वृत्तांमध्ये तथ्य नाही
- पुणे : नवर्याचा खून करून पत्नीने रचला आत्महत्येचा बनाव
पीएफची रक्कम थकल्यामुळे ईपीएफओच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे.
पीएफचे एक कोटी ४६ लाख रुपये थकलेले होते. ईपीएफओच्या वतीने ९२ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे.
शिल्लक थकबाकी घ्या वसुलीसाठी कारखान्याचे खाते सील (होल्ड) करण्यात आले. थकबाकी वसुलीसाठी कार्यवाही सुरु असल्याचे ईपीएफओ कार्यालयाने सांगितले आहे.
अधिक वाचा :
- आर्टिफिशीयल इंटेलिजन्स देशाच्या विकासासाठी महत्वाचे : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
- आर्टिफिशीयल इंटेलिजन्स देशाच्या विकासासाठी महत्वाचे : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
दरम्यान, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे कोणतेही बॅक खाते जप्त झालेले नसून यासंदर्भात येत असलेल्या बातम्या चुकीच्या
असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक जी पी एस दीक्षितूलू यांनी म्हटले आहे.
अधिक वाचा :
- मानसी नाईकच्या साजशृंगारवर पती म्हणतो, तू बेस्ट वाईफ आहेस…
- मुस्लीम महिला ऑनलाईन लिलावाच्या बळी; दिल्ली पोलिसात तक्रार दाखल
दुष्काळ आणि अन्य आर्थिक कारणांमुळे वैद्यनाथ कारखाना सध्या आर्थिक अडचणीतून जात आहे. अशा कठीण परिस्थितीत अशा
प्रकारच्या बातम्या देणं आणि शेतकऱ्यांचं भवितव्य धोक्यात आणणं हे एकूणच राजकीय खोडसाळपणाचे आहे.
कारखान्याचे असे कोणतेही खाते सील झालेले नाही असे कार्यकारी संचालक दीक्षितूलू यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :