कापूस व्यापारी खून प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांसह सहा जणांना अटक | पुढारी

कापूस व्यापारी खून प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांसह सहा जणांना अटक

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : कापूस व्यापारी स्वप्नील शिंदे याच्या खून प्रकरणात ( कापूस व्यापारी खून प्रकरण )  एलसीबी व स्थानिक पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. यामध्‍ये एक पोलीस कर्मचारी असल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक डॉक्टर प्रविण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मात्र, त्यांनी आरोपींची नावे सांगण्यास नकार दिला असून, या प्रकरणात आणखी काही आरोपी असू शकतात, असा संशय व्‍यक्‍त केला.

जळगाव येथून हवाल्याचे सुमारे १५ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी यांचा पाळधी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पैसे लुटण्याच्या प्रयत्नातून खून झाला होता. या प्रकरणी एलसीबीच्या पथकाने सात आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सात आरोपींपैकी एक आरोपी पोलीस कर्मचारी असल्याची खळबळजनक माहितीपोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे या वेळी दिली.

कापूस व्यापारी खून प्रकरण यातील तो आरोपी कोण? याची माहिती विचारली असता पोलिस अधीक्षकांनी तो तपासाचा भाग असून यात अजून गुन्हेगार असू शकतात व  तपासावर परिणाम होऊ नये म्हणून आरोपींची नाव पोलीस अधीक्षकांनी माहिती गुप्त ठेवली असल्याचे सांगितले.  दरम्यान, पोलीस कर्मचारी लूट आणि खून प्रकरणात आरोपी निघाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून तो कर्मचारी आणि ते आरोपी कोण? याबाबत चर्चेला उधाण आले आहे. गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी आरोपींची नाव उघड केली नाही. तसेच आरोपींचा पीसीआर न घेता थेट न्यायालयीन कोठडी घेतली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

जळगाव येथून हवाल्याचे सुमारे १५ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी यांची कार पाळधी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तीन दुचाकीवर आलेल्या चौघांनी अडविली. दुचाकीस्वाराला त्यांच्या कारने उडवल्याचा बहाणा करून पैशांची बॅग हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. व्यापाऱ्याने पैशांच्या बॅगे यावेळी हातातून सोडली नसल्याने हल्लेखोरांनी त्यांच्या मांडीवर, पोटावर चाकूने वार केले होते.

जखमी अवस्थेत व्यापाऱ्याने महामार्गावरून आपल्या बचावासाछी पळ काढला. यानंतर हल्लेखोरांनी सुमारे १५ लाख रुपयांची बॅग घेवून पसार झालेहोते. जखमी व्यापाऱ्याला तातडीने रुग्णवाहिकेत खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button