तांत्रिक अडचणी आलेल्या उमेदवारांचीच कौशल्य चाचणी पुन्हा घ्या : जयंत पाटील | पुढारी

तांत्रिक अडचणी आलेल्या उमेदवारांचीच कौशल्य चाचणी पुन्हा घ्या : जयंत पाटील

सांगली, पुढारी वृत्तसेवा : तांत्रिक अडचणी आलेल्या उमेदवारांचीच कौशल्य चाचणी पुन्हा घ्या, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना दिले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट-क अंतर्गत सहाय्यक आणि लिपीक टंकलेखक या पदाकरीता परीक्षा घेण्यात आली होती. मात्र टंकलेखनाच्या ऑनलाइन चाचणी दरम्यान उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत आयोगामार्फत टंकलेखन कौशल्य चाचणीस उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी नव्याने आयोजित करण्यात येणार असल्याचे पत्रक आयोगामार्फत निर्गमित केले आहे. या प्रश्नाकडे पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र लिहीले.

टंकलेखनाच्या ऑनलाइन चाचणी दरम्यान फार कमी विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी आल्या आहेत, त्यामुळे तांत्रिक अडचणी आलेल्या विद्यार्थ्यांचीच चाचणी पुन्हा घ्यावी. टंकलेखन कौशल्य चाचणी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करून अशा विद्यार्थ्यांना मानसिक त्रासातून दिलासा देण्यात यावा अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

.हेही वाचा 

भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस महिनाभर रद्द, प्रवाशांची होणार गैरसोय

शिर्डी : बैलगाडा शर्यतीचा लढा सर्वांच्या प्रयत्नांमुळे जिंकला : मंत्री विखे

Dudhganga Vedganga Sakhar Karkhana | राजकीय विरोधक प्रकाश आबिटकर आणि राहुल देसाई ‘बिद्री’च्या निवडणुकीत एकत्र येणार काय!

Back to top button