उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, पण भाजप पुन्हा...: देवेंद्र फडणवीसांचा निशाणा
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजप शिवसेना युतीला सत्ता दिली होती. परंतु, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठीत खंजीर खुपसला. आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन केली. परंतु अडीच वर्षांनी भाजप पुन्हा सत्तेत आला. त्यामुळे यापुढे भाजपला कुणीही हटवू शकणार नाही, असे आव्हान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांना आज (दि.१९) दिले. सावनेर येथील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
राज्यात आवास योजना सुरू केली आहे. या वर्षी ३ लाख घरे बांधली जाणार आहेत. राज्यातील सामन्य जनतेपर्यंत सर्व शासकीय योजना पोहोचविणार आहे. त्यासाठी शासकीय योजना गतीने राबविल्य़ा जातील. पुढील पाच वर्षात पंतप्रधान मोदी भारताला शिखरावर नेतील, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. नागपूरमध्ये भाजपची स्थिती मजबूत आहे. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सर्व जागा जिंकू. भाजपमध्ये मंत्री होण्यासाठी पैसे लागत नाहीत, असेही फडणवीस म्हणाले.
LIVE |📍सावनेर | भाजप कार्यकर्ता मेळावा
@Dev_Fadnavis https://t.co/9CkoICr5Vk— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) May 19, 2023
हेही वाचा