Manipur Violence: हिंसाचारानंतर सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय रेल्वेची मणिपूरमधील रेल्वे सेवा रद्द | पुढारी

Manipur Violence: हिंसाचारानंतर सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय रेल्वेची मणिपूरमधील रेल्वे सेवा रद्द

पुढारी ऑनलाईन: मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय रेल्वे प्रशासनाने भारतातील इतर राज्यातून मणिपूरला जाणाऱ्या ४ रेल्वे गाड्या रद्द (Manipur Violence) करण्यात आल्या आहेत. ५ मे ते ६ मे रोजी मणिपूरला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या बंद असणार आहेत, असे देखील भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.

मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर ईशान्य सीमा रेल्वेने देखील मणिपूरला जाणाऱ्या सर्व गाड्या थांबवल्या आहेत. मणिपूरमधील परिस्थिती सुधारेपर्यंत कोणतीही ट्रेन मणिपूरमध्ये दाखल (Manipur Violence) होणार नाही. मणिपूर सरकारने ट्रेनची वाहतूक थांबवण्याचा सल्ला दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ईशान्य फ्रंटियर रेल्वेचे सीपीआरओ ‘सब्यसाची डे’ यांनी एएनआयला दिलेल्या माहितीत सांगितले.

Manipur Violence: त्रिपुरा सरकारकडून नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सेवा

मणिपूर हिंसाचारादरम्यान येथे अडकलेल्या त्रिपुरातील नागरिकांच्या मदतीसाठी सरकारने हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. मणिपूरमधील त्रिपुरातील रहिवाशांना 24×7 मदत देण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली असल्याचे त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक शहा यांनी ट्विट करून सांगितले आहे.

Manipur Violence: विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अरुणाचल सरकारकडून समिती स्थापन

अरुणाचल प्रदेश सरकारने आपल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मणिपूर सरकारसोबत संपर्कात असल्याचे स्पष्ट केले आहे. मणिपूरमधून आमच्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी अरूणाचलचे आयुक्त आणि सीएमओच्या देखरेखीखाली एक समन्वय समिती देखील स्थापन करण्यात आली आहे,” अशी माहिती अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी ट्विट करून सांगितले आहे.

हेही वाचा:

Back to top button