ठाणे : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याने एकावर गुन्हा दाखल | पुढारी

ठाणे : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याने एकावर गुन्हा दाखल

ठाणे – पुढारी वृत्तसेवा : भर दुपारी रस्त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केल्याने एका तरुणावर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळशीराम ज्ञानदेव साळवे असे तरुणाचे नाव आहे. तुळशीराम याने १९ फेब्रुवारी रोजी दुपारी जयभीम नगर ते कळवा नाका अशी मोटार रॅली काढली. त्यानंतर कळवा नाका येथे पोहचताच त्याने तेथे थांबून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग आणि सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण झाल्याने नाक्यावर उभ्या असलेल्या पोलीस नाईक कदम यांनी तुळशीराम यांच्यावर सार्वजनिक शांततेचा भंग, वाहतुकीस अडथळा आणि विनापरवाना मोटार रॅली काढणे यासंदर्भात कळवा पोलीस ठण्यात गुन्हा दखल केला आहे.

Back to top button