जीव माझा गुंतला : अंतरा-मल्हारच्या आयुष्यात आलंय मेघ नावाचं नवं संकट! | पुढारी

जीव माझा गुंतला : अंतरा-मल्हारच्या आयुष्यात आलंय मेघ नावाचं नवं संकट!

पुढारी ऑनलाईन डेस्क : कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेत अंतरा आणि मल्हारच्या विरोधात बरीच कटकारस्थानं आतापर्यंत चित्रा काकी, काका आणि श्वेता मिळून रचत आले. पण, आता मात्र यांच्या आयुष्यात मेघ हे नवं संकट पुढ्यात येऊन ठाकलं आहे. मल्हार – अंतरा या संकटाला कसे सामोरे जाणार? मेघचा नक्की काय हेतू आहे ? त्याच्या मनात नेमकं काय आहे? चित्रा काकी आणि मेघ मिळून मल्हार-अंतराच्या विरोधात कोणता डाव रचणार? हे बघणे रंजक असणार आहे. मालिकेत मेघची भूमिका बिपीन सुर्वे हा अभिनेत्रा साकारतो आहे.

बिपीन आपल्या पात्राविषयी बोलताना म्हणाला, जीव माझा गुंतला या मालिकेमधून एका अनोख्या आणि दमदार भूमिकेमध्ये मेघ खानविलकर म्हणून मी तुमच्या भेटीला येतो आहे. खूप मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतं. कारण, मल्हार आणि अंतरा यांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतं आहे. ज्या पद्धतीने हे पात्र समजावून त्याचे महत्त्व सांगितल गेलं. या नकारात्मक पात्राची त्याच्या कुटुंबाशी असलेली द्वेषाची भावना, भावाबद्दल सुडाची भावना या सगळ्या गोष्टींमुळे भूमिकेच्या प्रेमात पडलो आणि लगेच तयार झालो. मेघ या पात्राबद्दल जेव्हा मला विचारलं गेलं , त्याच दरम्यान मला काही ठिकाणी प्रमुख आणि सकारात्मक भूमिकेसाठीही ऑफर मिळाली.

 

मीदेखील चांगल्या संधीच्या, चॅलेंजिंग पात्राच्या शोधात होतो , पण मेघ खानविलकर या पात्राची ऑडिशन देत असतानाच मी स्वतःच त्या पात्राच्या प्रेमात पडलो. कारण ऑडिशन script मध्येच इतकी छान मजा मांडली होती की, पुढे ते साकारत असताना काय मजा असणार हे तेव्हाच समजले. जेव्हा त्याच्याबद्दल पूर्ण माहिती मिळाली हिरो सारखी विलनची एंट्री धमाकेदार असणार आहे हे ऐकल्यावर तर माझ्यातील भूमिकेसाठीची उत्सुकता खूपच वाढली.

Back to top button