हिंमत असेल तर आमदारकी सोडून निवडणुकीला सामोरे जा : आदित्य ठाकरेचे शिंदे गटाला आव्हान! | पुढारी

हिंमत असेल तर आमदारकी सोडून निवडणुकीला सामोरे जा : आदित्य ठाकरेचे शिंदे गटाला आव्हान!

पुढारी ऑनलाइन डेस्क : शिंदे गटाने केले ते बंड नव्हे तर गद्दारी आहे, असा हल्ला चढवत हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले. मुंबई बाहेर शिवसेनेची शिवसंवाद यात्रा सुरू आहे. यावेळी आदित्य ठाकरेने शिंदे गटावर हल्लाबोल करत बंडखोरांना आव्हान दिले. तसेच त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार देखील केला.

बंडखोर स्वतःला खूप शूरवीर समजतात. मात्र, त्यांनी सांगावे त्यांच्यावर गुवाहटीवर पळून जाण्याची वेळ का आली. त्यांची पक्षप्रमुखांशी बोलण्याची हिंमत का झाली नाही. मुळात शिवसैनिक शिवसेना सोडून गेलेच नाहीत तर ज्यांना मंत्रीपद दिले ते सोडून गेले. खरंतर आमचेच चुकले. आम्ही बंडखोरांवर जास्तच विश्वास दाखवला. ज्यांच्यावर विश्वास दाखवला त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला.

शिंदे-फडणवीस हे सरकार कोसळणारच

शिवसंवाद यात्रेत प्रश्नांचा भडीमार करत आदित्या ठाकरेने शिंदे गटावर कडक शब्दांत हल्लाबोल चढवला. तसेच हे गद्दारांचे हे शिंदे-फडणवीस सरकार कोसळणारच, असे देखील ठणकावून सांगितले आहे. तसेच हिंमत असेल तर आमदारकी सोडून निवडणूक लढवून दाखवा असे खुले आव्हान आदित्य ठाकरेने दिले आहे.

हे ही वाचा :

Back to top button