कोल्हापूर : जोरदार पावसामुळे पुन्हा महापुराची धास्ती
अब्दुल लाट; अंकुश पाटील : गेल्या तीन-चार दिवसांपासून सर्वच ठिकाणी पावसाची रिपरिप चालू झाली आहे. धरण क्षेत्रात देखील दमदार अतिवृष्टी बरसत आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पाणी पात्राबाहेर पडले आहे. कृष्णा नदीपात्रातील वाढते पाणी तर पंचगंगा नदीपात्रातून पाणी बाहेर पडल्याने वाढत असलेल्या पाण्याची धास्ती शहरांसह ग्रामीण भागातील नागरिकांनी घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पात्रातून पाणी बाहेर पडले आहे. वाढत्या पाण्यामुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे ग्रामीण भागात पुरपट्ट्यात ग्रामस्थांनी महापुराची धास्ती घेतली आहे. स्थलांतरित होण्याच्या विचाराने व परत संसार उघड्यावर पडणार या विचाराने अनेक कुटुंबे चिंतातूर झाल्याचे दिसत आहेत. मळे भागात वास्तव्यास असणारे शेतकरी कुटुंबांचे देखील जनावरांचे तळ इतरत्र हलवावे लागणार या चिंतेत आहेत. त्यांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे. या चिंतेने शेतकऱ्यांचे देखील धांदल उडाल्याचे दिसत आहे.
महापुराच्या धास्तीने अनेक नागरिक स्थलांतराच्या मानसिकतेत आहेत. दुसरीकडे भाड्याच्या घरांचे भाडे दुप्पट झाली आहेत. तर काहींच्या कडून आधीच जास्त पैसे मोजून भाड्याची घरे बुकींग केली जात आहेत. अशीही परिस्थिती पाहायला मिळत आहे. तर गरीब, कष्टकरी कुटूंब भीती व चिंतेत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. कारण एका बाजूला महापुराची धास्ती तर एका बाजूला रोजगाराची आशा दुहेरी संकटाचा सामना या कुटुंबाना करावा लागणार आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष,
जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर.
दि -:०९/०७/२०२२
दुपारी १२ :०० वाजता
राजाराम बंधारा पाणी
३० फूट ११ इंच इतकी आहे.
;(पंचगंगा नदी इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी ४३ फूट आहे.)
एकुण पाण्याखालील बंधारे २६@MahaDGIPR @drsskharat @CollectorKolha1— DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR (@InfoDivKolhapur) July 9, 2022
#कोल्हापूर : तालुकानिहाय #पर्जन्यमान
9 जुलै 2022@MahaDGIPR @drsskharat @CollectorKolha1 pic.twitter.com/lDsmgv9IdV— DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR (@InfoDivKolhapur) July 9, 2022
हेही वाचलंत का?
- Shahrukh Khan Mother : शाहरुखच्या आईचा फोटो व्हायरल, इंदिरा गांधींशी होते त्यांचे खास नाते?
- अमरावतीतील दुषित पाणी प्रकरण : मुख्यमंत्री शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या खबरदारीच्या सूचना
- श्रीलंकेतील संघर्ष टोकाला! आंदोलकांनी घेरल्याने राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंचे निवासस्थानातून पलायन
- नाशिक जिल्ह्यातील साडेसात लाख घरांवर फडकणार तिरंगा, ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाची जय्यत तयारी