मुंबईतील दहा टक्के पाणी कपात रद्द; मुंबईकरांना दिलासा
मुंबई : पुढारी वृत्तसेवा; मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन चार दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे शहरात लागू असलेली 10 टक्के पाणी कपात शुक्रवारपासून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या पंधरा-वीस दिवसापासून पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, तुळशी, विहार तलावात जूनमध्ये समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे शहरात दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. त्यामुळे शहर व उपनगरातील अनेक नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र तलाव क्षेत्रात आता पाऊस दाखल झाला असून तलावातील पाणीसाठा ३ लाख ७५ हजार ५१४ दशलक्ष लिटरवर म्हणजे २५.९४ टक्के इतका झाला आहे. त्यामुळे शहरातील पाणी कपात रद्द करण्यात येत असल्याचे पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचलंत का?
- धनुष्यबाण शिवसेनेचा आहे अन् पुढेही राहील, विधानसभा निवडणूक घेण्याचे उद्धव ठाकरेंनी दिले आव्हान
- जनसामान्यांचे प्रश्न मांडले जाणार थेट लोकसभेत; खासदार सुप्रिया सुळे यांचा अभिनव उपक्रम
- Abe Shinzo : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावरील हल्ल्याने पंतप्रधान मोदी व्यथित, म्हणाले…
- शिंदे गट-फडणवीस यांच्यात खातेवाटपावरून रस्सीखेच, मुख्यमंत्री आज दिल्लीत; ‘फॉर्म्युला’ ठरणार