वातावरणात बदल : मोरजी किनारी कासवांचे आगमन उशिराने
पेडणे, पुढारी वृत्तसेवा: सध्या वातावरणात प्रचंड बदल आणि वर्षभर पडत असलेल्या पावसामुळे सागरी कासवांचे आगमन उशिराने झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात येणारी कासवे थेट डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आली.दरम्यान, 23 डिसेंबर रोजी एका कासवाने 136 अंडी घातली व ती माघारी फिरली. त्या अंड्यांना वन विभागाच्या कर्मचार्यांनी संरक्षण दिलेले आहे.
मोरजी किनारी भागात 1997 पासून कासव संवर्धन मोहीम राबवली जाते. 2002 साली या किनारी 500 चौरस मीटर जागा आरक्षित केली आहे. आतापर्यंत किनार्यावर 248 कासावांनी अंडी घातली, त्यातील 16735 एवढी पिल्ले वाचविण्यास वन विभाग यशस्वी झाले आहे. 2000 साली सर्वाधिक 31 कासव किनारी आले. यावर्षी तरी एकाच कासवाने अंडी घातली आहेत. यंदा वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे कासवांचे आगमन उशिराने झाले.
मोरजी तेंबवाडा किनारी भागात मागच्या वीस वर्षांपासून कासव संवर्धन मोहीम यशस्वीरित्या राबवली जाते. त्यामुळे दुर्मीळ सागरी कासवाच्या जातीना संरक्षण मिळाले आहे. या सागरी कासवामुळे आणि संवर्धन मोहिमेमुळे मोरजीचे नाव आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर झळकले आहे. या कासव संवर्धन मोहिमेमुळे मोरजीत मोठ्याप्रमाणात पर्यटनाला वाव आहे. हीच कासव संवर्धन मोहीम या पर्यटन व्यवसाय तारु शकणार आहे, असे जाणकारांचे मत आहे
- निष्ठेला किंमत नाही? : उत्पल पर्रीकर
शॅक्स व्यवसायावर परिणाम
कासव संवर्धन मोहिमेमुळे अनेक देशातील पर्यटक या किनारी भागाला दरवर्षी भेट देतात. या कासव संवर्धन मोहिमेमुळे सध्या किनारी भागातील शॅक्स व्यवसायावर विपरित परिणाम झाल्याचे चित्र निर्माण केले गेले आहे. कासवांना जगवावे की शॅक्स व्यवसायाला अशी स्थिती मोरजी किनारी भागात झाल्यामुळे शॅक्स वितरित करण्यास विलंब होत आहे.
वर्ष एकूण कासव सोडलेली पिल्ले
2012/2013 7 501
2013/2014 4 162
2014/2015 8 331
2015/2016 6 378
2016/2017 10 58
2017/2018 14 990
2018/2019 22 322
2019/2020 15 1437
2020/2021 24 1764
2021/2022 11 136