कृत्रिम बुद्धिमत्तेवर मंथन व्हायला हवे | पुढारी

कृत्रिम बुद्धिमत्तेवर मंथन व्हायला हवे

कल्याणी शंकर, सायबर तज्ज्ञ

एका जागतिक आर्थिक संस्थेच्या एका अहवालात म्हटले आहे की, कृत्रिम बुद्धिमत्ता या (एआय) तंत्रज्ञानावर भारताचा खर्च हा 2025 पर्यंत 11.78 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तथापि, एआयमुळे मानवी कौशल्य गमावण्याची शक्यता, जादा खर्च आणि किचकटपणा, विश्वसनीयता आदी मुद्दे आणि तंत्रज्ञानावरचे वाढते अवलंबित्व असे अनेक फटके बसू शकतात, ही जागतिक भीती दुर्लक्षित करता येणार नाही.

सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा व्यापक प्रमाणात वापर करण्यात आला. या तंत्राची मदत घेत हिंदी, तमिळ आणि तेलुगूसारख्या भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित गाणीही तयार केली. ही गाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. शिवाय मतदारांना आणि पक्ष कार्यकर्त्यांना, समर्थकांना व्यक्तिगत संदेश देण्यासाठी एआय संचलित व्हाईस क्लोनिंग टूलचाही वापर केला गेला आहे. तेलुगूत मोदी यांचे डिजिटल रूपातून तयार केलेले गाणे सोशल मीडियावर दोन दशलक्षपेक्षा अधिक वेळा पाहिले गेले.

या तुलनेत त्यांच्याच आवाजातील तमिळ भाषेतील गाणे 2.7 दशलक्षपेक्षा अधिक वेळा पाहिले गेले. याशिवाय मोदी यांचा आवाज असणार्‍या एका पंजाबी गीतालाही सोशल मीडियावर 17 दशलक्षपेक्षा अधिक काळ पाहिले गेले. भारतीय अमेरिकी गायिका फाल यांनी मोदी यांच्यावर साकारलेले ‘एव्हेडन्स इन मिलेट्स’ या त्यांच्या गीताला ग्रामीण नामांकन मिळाले आहे. काँग्रेस आणि भाजपने एआय पुरस्कृत व्हाईस क्लोनिंग टूलचा विपुल वापर केला आहे. यात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

काही दूरचित्रवाहिन्यांनी कार्यक्रम संचलनासाठी ओडिशी, कन्नड आणि हिंदीत एआय अँकरचा आविष्कार केला आहे. एआयने भारतात आरोग्य सेवेत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणला आहे. उच्च प्रतीचे तंत्रज्ञान, उपचार, निदान करण्याबरोबरच रुग्णांची काळजी करण्याची जबाबदारी उपकरण पार पाडत आहेत. परिणामी, आरोग्य सेवेत आमूलाग्र बदल झाले आहेत. एका जागतिक आर्थिक संस्थेच्या एका अहवालात म्हटले आहे की, एआय तंत्रज्ञानावर भारताचा खर्च हा 2025 पर्यंत 11.78 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 2035 पर्यंत एआय तंत्रज्ञान भारतीय अर्थव्यवस्थेत एक ट्रिलियन डॉलर जोडण्यातला हातभार लावेल. म्हणूनच पंतप्रधान मोदी हे भारतात एआय विकासाला चालना देण्यासाठी इच्छुक आहेत.

या सर्व गोष्टी एक प्रश्न निर्माण करत आहेत आणि ते म्हणजे एआय हळूहळू जग ताब्यात घेणार काय? 1 नोव्हेंबर रोजी ब्रिटनच्या ऐतिहासिक बॅलेचले पार्कमध्ये आयोजित पहिल्या एआय सुरक्षा शिखर परिषदेत राजकीय आणि उद्योग जगातील मान्यवरांनी एआयमुळे निर्माण होणार्‍या धोक्यावर चर्चा केली. तंत्रज्ञानाला सुरक्षित रूपाने कसे विकसित करता येईल, यावर मंथन करण्यात आले. संयुक्त राष्ट्र आणि युरोपीय संघासह सुमारे 28 देशांनी शिखर संमेलनात सहभाग नोंदविला होता.

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी अमेरिकेचे प्रतिनिधित्व केले. भारताचे प्रतिनिधित्व राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केले. यावेळी त्यांनी एआय आणि तंत्रज्ञानाने चांगले, सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा प्रदान करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. एआयमुळे वेगाने होणार्‍या प्रगतीची धास्ती आहेच, त्याबरोबर उत्साहही निर्माण होत आहे. या परिषदेत सामील झालेल्या मंडळींनी एआयमुळे होणारे संभाव्य तोटे आणि फायदे यावर चर्चा केली. एआयमुळे मानवता सुरक्षित राहील, अशी आशा बाळगून असणार्‍या लोकांनीही मत मांडले. त्यांनी या मुद्द्याची जागतिक पातळीवर असणारी व्यापकता सांगितली.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक यांनी, संगणकावर मानवाच्या वाढणार्‍या अवलंबितेबाबत तसेच मानवतेच्या सुटणार्‍या नियंत्रणाबाबत चिंता व्यक्त केली. सायबर हल्ल्यातील एआय तंत्रज्ञानाचा वाढत्या वापरावरही चर्चा करण्यात आली. अशा वेळी एआयचा वाढता वेग हा चिंताजनक परिस्थिती निर्माण करणारा असून, त्याचा कधी थांगपत्ताही कोणाला लागला नाही. त्यामुळे भविष्यात जागतिक अर्थव्यवस्था ढासळू शकते आणि लोकशाही संकटात सापडू शकते, असे बोलले गेले. ब्रिटनने अधिकृतरित्या एआय सुरक्षा संस्थेची स्थापना करण्याची घोषणा केली. ही संस्था एआयमुळे निर्माण होणार्‍या स्थितीच्या सुरक्षेचे आकलन करेल.

एआयच्या समर्थकांनी केलेल्या दाव्यानुसार, एआय तंत्रज्ञान सक्रिय केल्याने डाटा विश्लेषण करण्यात, निर्णय घेण्यात, चोवीस तास सक्रिय राहणे, त्रुटी कमी करणे आणि सुरक्षेचे निकष निश्चित करण्यात सुधारणा करता येऊ शकते. मतदारांची नोंदणी आणि पडताळणी यासाठी यासाठी एआयचा वापर करता येऊ शकतो. मतदारांची संभाव्य भूमिका आणि त्याचे विश्लेषण करण्यासाठी एआयचा वापर केल्याने राजकीय पक्षाला, नेत्यांना फायदा मिळेल. एआय हा मानवी भावना ओळखण्यासाठी आणि राजकीय प्रचार मोहिमांसाठी आवश्यक असलेल्या मुद्द्यांची निवड करण्यासाठी सोशल मीडियावरील मतमतांतरांचे विश्लेषण करू शकतो.

या आधारावर राजकीय पक्षांना, नेत्यांना कृती आराखडा तयार करता येऊ शकेल. याशिवाय एआयमुळे फसवणूक, हॅकिंगचे प्रयत्न आणि अन्य गैरप्रकारांचा शोध लावण्यात हातभार लावता येईल, तसेच त्याला रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणेचे नियोजन करता येणे शक्य आहे. एआयमुळे निवडणुकीचा संभाव्य निकाल सांगण्यासाठी ऐतिहासिक डेटा विश्लेषण आणि सध्याच्या घटनांचा विचार करता येऊ शकतो.

एआय संचित चॅटबॉट हे मतदारांना मतदान केंद्र, उमेदवारांचे प्रोफाईल आणि अतिरिक्त निवडणुकीसंबंधीची महत्त्वपूर्ण माहिती प्रदान करू शकते. एकंदरीत, सर्व नोकरीच्या ठिकाणी एआयचा वापर करू द्यावा का? या प्रश्नाचे उत्तर शोधावेच लागेल. यात समाधान देणार्‍या रोजगारांचाही समावेश आहे. असे असताना आपण कशासाठी बिगर मानव विभाग विकसित करत आहोत? हा विभाग हुशारीने मानवाला मागे टाकू शकतो आणि मानवाचे स्थान घेऊ शकतो. अद्याप संपूर्णपणे एआयकडे वळण्यासाठी वेळ लागेल. हा सुरुवातीचा टप्पा आहे. पण याच टप्प्यावर एआय तंत्रज्ञान हे हानिकारक आहे की स्वागतार्ह आहे, याचा विचार करायला हवा.

Back to top button