चंद्रपूर : खासगी बसचा अपघात; १ ठार, ४ जण गंभीर | पुढारी

चंद्रपूर : खासगी बसचा अपघात; १ ठार, ४ जण गंभीर

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : बल्लारपूर तालुक्यातील किन्ही गावाजवळ शुक्रवारी  (दि.१२) रात्री १० च्या सुमारास  (एमएच ३४ एबी ८०७५) खासगी बसचा अपघात झाला. या अपघातात १ जण ठार तर २३ प्रवाशी जखमी झाले. सुनंदा हरिदास मडावी (वय ५०) असे मृत महिलेचे नाव आहे. २३ जखमी प्रवाशांना जिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.

शुक्रवारी रात्री वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या प्रवासी बसचा राजुरा-नांदगाव घोसरी (ता. मूल) मार्गावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. या अपघातात सुनंदा हरिदास मडावी या महिलेचा मृत्यू झाला. तर २३ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी ४ प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. यामध्ये समीर संतोष बावणे (वय २५), दामोदर हजारे (वय ४६), कविता ड्रायव्हर (वय ४५), मिराबाई कामतकर (वय ६३) यांचा समावेश आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बल्लारपूर पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा;

Back to top button