भंडारा : गोसे धरणाच्या उजव्या कालव्यातून २ तरुण वाहून गेले | पुढारी

भंडारा : गोसे धरणाच्या उजव्या कालव्यातून २ तरुण वाहून गेले

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपूर्वी पवनी तालुक्यातील अत्री येथे ३ तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना पवनी येथील गोसे धरणाच्या उजव्या कालव्यात आंघोळीसाठी गेलेले २ तरुण वाहून गेले. त्यांचा शोध सुरू आहे. ही घटना बुधवारी (दि.३१) दुपारी घडली.

अमु खान (वय २२) व निम्मु खान (वय ३६, रा. नागपूर) हे गोसे धरणाच्या उजव्या कालव्यात आंघोळ करण्यासाठी गेले होते. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात वाहून गेले. पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने या तरुणांचा शोध घेण्यात येत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button