खा. कोल्हेंबाबत अजित पवारांनी वस्तुस्थिती मांडली : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील | पुढारी

खा. कोल्हेंबाबत अजित पवारांनी वस्तुस्थिती मांडली : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबाबत खरी वस्तुस्थिती मांडली, अशी टीका माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. अजित पवार यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली नसून त्यांनी केलेले वक्तव्य वस्तुस्थितीला धरून आहे. गेली पाच वर्षे मतदारसंघातील जनता खासदार आम्हाला भेटावा म्हणून आक्रोश करीत आहे. मात्र, विद्यमान खासदारांना मतदारसंघात फिरण्यास वेळ नाही व ते आता आक्रोश मोर्चा काढत आहे.

पाच वर्षांत कुठलेही काम केले नसून मीच केलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत, अशी टीका माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर केली आहे. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे ठरवतील तो उमेदवार शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवेल व ते आम्हास मान्य आहे. मी लढणारा माणूस असून, माझ्यासमोर कोण उभे आहे? हे न पाहता पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवेन, असेही आढळराव पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button