Murder : गिरणा नदी पात्रात तरुणाची हत्या; धरणगाव तालुक्यातील घटना
जळगाव : गिरणा नदीपात्रात २२ वर्षीय तरुणाची हत्या (Murder) झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे उघडकीस आली आहे. तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत पाहणी केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील आशिष प्रकाश शिरसाळे (वय २३ रा. शनी नगर बांभोरी) हा तरुण रात्री जेवण केल्यानंतर शौचास गेला होता. या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून (Murder) केला.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील, धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उद्धव ढमाळे यांच्यासह पाळधी पोस्टचे पोलीस कर्मचारी दाखल झाले. आशिषची क्रूर हत्या नेमकी कशामुळे झाली याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी रात्री उशिरा धरणगाव पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :