नाशिक : वारकऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन अटक करा | पुढारी

नाशिक : वारकऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन अटक करा

देवळा : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

आळंदी येथे वारकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा देवळा तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला. संबधितांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात यावी या आशयाचे निवेदन निवासी नायब तहसीलदार दिनेश शेलूकर यांना देण्यात आले.

दरवर्षी पांडूरंगाची वारी नियमित व शांततेत पार पडते. मात्र यंदा शिंदे फडणवीस सरकारच्या काळात पहिल्यांदाच देवाच्या आळंदीत वारकऱ्यांवर लाठी हल्ला करण्यात आला. हा अत्यंत निंदनिय प्रकार असल्याचे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)गटाच्या देवळा शहर व तालुक्याच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. नायब तहसिलदार दिनेश शेलुकर यांना निवेदन देण्यात आले. दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी उप जिल्हा प्रमुख सुनिल पवार, तालुका प्रमुख बापु जाधव, शहर प्रमुख विश्वनाथ गुंजाळ, तालुका संघटक प्रशांत शेवाळे, उप तालुका प्रमुख विलास शिंदे, उप तालुका संघटक भास्कर आहिरे, उप शहर प्रमुख जितेंद्र भामरे, सोमनाथ शिंदे, खंडू जाधव, सतिष बोरसे, धनंजय शिरसाठ, नाना चव्हाण आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button