फडणवीसांनी पोलिसांना बळाचा वापर करायला सांगितलं: संजय राऊत यांचा गंभीर आरोप | पुढारी

फडणवीसांनी पोलिसांना बळाचा वापर करायला सांगितलं: संजय राऊत यांचा गंभीर आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांना बळाचा वापर करायला सांगितलं, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते. बारसूबाबत अधिकारी मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देताहेत, असेही त्यांनी नमूद केले.

७० टक्के ग्रामस्थ आमच्या बाजूने असल्याचे सरकार म्हणतं. तुम्ही पोल , सर्व्हे केला आहे का, असा प्रश्न यावेळी राऊत यांनी विचारला. मुख्यमंत्री तिकेड मॉरिशसमध्ये गेले आहेत. ऑईल रिफायनरीसाठी आमच्या कोकणातल्या माणसांना त्रास दिला जातोय. भूमीपुत्रांना निर्घुणपणे मारहाण केली, असेही त्यांनी सांगितले.

राऊत म्हणाले-मुख्यमंत्र्यांची प्रशासनावर पकड नाही. राज्यात गोंधळ सुरु आहे. सरकारने ग्रामस्थांशी चर्चा करावी. बारसूबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका तिच जी पक्षाची भूमिका असेल. बारसूप्रकरणी सरकारमध्ये समन्वय नाही.

मविआमध्ये मतमतांतर नाहीत. आज उद्धव ठाकरेंची भेट घेऊन पुढील निर्णय घेऊ. बेरोजगारी, महागाईवर सरकारने बोलावं, असंही त्यांनी नमूद केलं.

Back to top button